Raghunathdada Patil esakal
सोलापूर

Latur : आतापर्यंतची सरकारे उद्योगपतींचीच; रघुनाथदादा पाटील

वलांडी येथे ऊस, सोयाबीन परिषद

सकाळ वृत्तसेवा

देवणी : नेहरु ते मोदी सरकार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर उद्योगपतींचे असल्याचा आरोप शेतकरी संघनेटेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.वलांडी (ता. देवणी) येथे आयोजीत उस सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कर्नाटकचे रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष निर्मलकांत पाटील, महिला आघाडीच्या विमलताई आकनगिरे, काशिनाथ बिरादार, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, सरपंच राणीताई भंडारे, ज्येष्ठ शेतकरी नेते दगडु पडिले, जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, सुरेंद्र अंबुलगे, विनायकराव पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती.

यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले राज्यातील २०३ साखर कारखाने हे केवळ पंचवीस घराण्याकडे आहेत. कारखाना निर्मीतीच्या जाचक अटीमुळे नवीन कारखाने उभारणे कठीण बनत आहे. त्यामुळे दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द केल्यास निश्चीतच कारखान्यांची संख्या वाढुन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळु शकेल. ऊसाचे वजन खाजगी वजन काट्यावर करण्याची परवानगी देण्यात यावी.

भारत देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असुन निर्यात करण्यास सक्षम असतानाही शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागतो हे राज्यकर्त्यांनी आखलेले धोरण आहे. आगामी काळात या धोरणात सकारात्मक विचार करुन बदल केल्यास निश्चीतच कर्जाच्या फासातुन शेतकऱ्यांची मु्क्तता होऊ शकेल. बाजार व तंत्रज्ञानाच स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळावं, जागतिक बाजारपेठेनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहा हजार रुपये असणारे सोयाबीनचे बाजारभाव यावर्षी निम्म्याने घसरले असून पाच हजार झाले आहेत. सोयापेंड व पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे भाव कोसळले. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळेच आज देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT