jay siddheshwar swami SAKAL
सोलापूर

रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ! जिल्ह्यात साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू

जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखले जावेत, ब्लॅकस्पॉट कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची दरमहा तर खासदारांच्या अध्यक्षतेखालील समितीची तीन महिन्यांनी बैठक होणे अपेक्षित आहे. पण, मागील पाच महिन्यांत खासदारांना या बैठकीसाठी वेळच मिळालेला नाही, हे विशेष.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखले जावेत, ब्लॅकस्पॉट कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची दरमहा तर खासदारांच्या अध्यक्षतेखालील समितीची तीन महिन्यांनी बैठक होणे अपेक्षित आहे. पण, मागील पाच महिन्यांत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी याना बैठकीसाठी वेळच मिळालेला नाही, हे विशेष.

जिल्ह्यातील रस्ते अपघातात २०१९ नंतर तब्बल दोन हजारजणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ब्लॅकस्पॉट देखील वाढले आहेत. शहरातील पादचारी मार्ग गायब झाले आहेत. तर सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड खड्डेमय झाल्याने त्याचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक फोडून अनेक दुचाकीस्वार तेथून रस्ता ओलांडतात. महामार्गांवर अनेक ठिकाणी महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस असतात, तरीदेखील वाहनांचे अपघात कमी झालेले नाहीत. रस्त्यांवर जनजागृतीपर फलक दिसत नाहीत. महामार्गावर वाहन बंद पडल्यानंतर दोन दिवस तसेच असते. रस्त्यांलगत असलेली लोखंडी संरक्षक जाळी तुटल्याने अनेक जनावरे महामार्गावर येतात. अशा अनेक अडचणी असतानाही रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर त्यावर तोडगा काढला जात नाही. जिल्ह्यातील रस्ते अपघात वाढल्याची दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे. आता ते कधी वेळ देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

सर्व्हिस रोडची दुरवस्था
सोलापूर-विजयपूर, सोलापूर- तुळजापूर, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- पुणे या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यातही सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गांवर अपघात वाढले आहेत. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत सोलापूर शहरातील २१५ तर ग्रामीणमधील एक हजार ५०९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तर १ जानेवारीपासून शहरातील अपघातात जवळपास २२ तर ग्रामीणमधील अपघातात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गांवरील खड्डे, तुटलेले दुभाजक, वापरण्यायोग्य नसलेला सर्व्हिस रोड, महामार्गावर उभारलेली मोठी वाहने, त्या अपघातास कारणीभूत ठरली आहेत.

जिल्ह्यात ७६ ब्लॅकस्पॉट
महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर वाहनांचा वेग वाढला असून, रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. अशावेळी महामार्गांवर अपघात होणार नाहीत, अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) कमी व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. पण, रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना फाइलमध्ये तशाच गुंडाळून ठेवल्या जातात, असे बोलले जाते. त्यामुळे सध्या शहरात २१ तर ग्रामीणमध्ये ५५ ब्लॅकस्पॉट असून मागील काही वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT