pakshi 3.jpg
pakshi 3.jpg 
सोलापूर

होटगी तलावात जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांची निसर्गप्रेमींनी केली सुटका 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः होटगी तलाव परिसरात पक्ष्यांसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून टिटवी, पानकावळा, हळदी-कुंकू आदी चार पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निसर्ग प्रेमी कार्यकर्त्यांनी तलावात टाकलेली जाळी कापून चार पक्ष्यांची सुटका केली. 

वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे सदस्य रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार, अजय हिरेमठ, विनय गोटे, अभिषेक कुलकर्णी, रोहन सरडे हे होटगी तलाव येथे पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीसाठी गेले होते. त्या परिसरात प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. या तलावाच्या परिसरामध्ये अनेक पक्षी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेले दिसले. 

शिकारीच्या जाळ्यात अडकलेले पक्षी जीव वाचवण्यासाठी तडफड करत होते. तेव्हा या सदस्यांनी लगेच पाण्यात उतरुन जाळे कापले आणि पक्ष्यांची सुटका केली. वंचक, उघड्या चोचीचा करकोचा, रातबगळा, कांडेसर या पक्ष्यांनी सुटकेनंतर आकाशात गगनभरारी घेतली. 
टिटवी, पाणकावळा, हळदी कुंकू व मुंगूस आदी मात्र जाळ्यात अडकून मृत्यू पावल्याचे दिसून आले. वन विभागास माहिती देऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी वन्यजीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद शेटे, फाउंडेशनचे सदस्य संतोष धाकपाडे उपस्थित होते. मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली असताना दुर्देवाने त्यामध्ये काही जण पक्ष्यांची शिकार करतात की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT