driving licence esakal
सोलापूर

१२ कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला! ‘हे’ ५ नियम पाळा, अन्यथा वाहन लायसन निलंबन

सोलापूर रस्ते अपघातात राज्याच्या टॉप-टेन जिल्ह्यांमध्येच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हेच मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांत ‘आरटीओ’ने २०७ जणांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले असून, ६९ जणांची पडताळणी सुरू आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत शहर परिसरातील दीडशे रस्ते अपघातात जवळपास ७०, तर ग्रामीणमध्ये ७९० अपघातांमध्ये ४५० हून अधिकजण मरण पावले आहेत. पाच-सहा वर्षांपासून सोलापूर रस्ते अपघातात राज्याच्या टॉप-टेन जिल्ह्यांमध्येच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हेच मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांत ‘आरटीओ’ने २०७ जणांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले असून, ६९ जणांची पडताळणी सुरू आहे.

दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे, चारचाकीत बसल्यावर सीटबेल्ट लावणे, ओव्हरलोड, ओव्हरस्पीड नको आणि मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये, असे अपघात रोखण्यासाठीचे प्रमुख नियम आहेत. तरीदेखील रस्त्यावरून जाताना वाहतूक नियम मोडून अतिवेगात वाहने चालवली जातात. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉटची संख्या वाढली तथा फारशी कमी झाली नाही. दरमहा जिल्हाधिकारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, असे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करतात. परंतु, मोठा अपघात झाल्याशिवाय त्या ठिकाणांकडे संबंधित यंत्रणा पाहत सुद्धा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, वाहनचालकांनी देखील त्यांच्या घरातील मुले, आई-वडील, पत्नी, भाऊ हे सर्वजण आपली वाट पाहात आहेत, याचे भान ठेवून शिस्तीत वाहन चालवणे काळाची गरज आहे.

परवाना निलंबनाची प्रमुख पाच कारणे...

  • वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा माल वाहतूक करणे

  • मोबाईलवर बोलत वाहन चालविणे

  • मद्यपान (दारू पिऊन) करून वाहन चालविणे

  • वाहतूक सिग्नल तोडून वाहन पुढे नेणे

  • वेग मर्यादा ओलांडून अतिवेगाने वाहन चालविणे

दोन लाख बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रस्ते अपघात होऊ नयेत, या हेतूने आरटीओ, शहर व ग्रामीण पोलिसांची वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सातत्याने बेशिस्तांवर कारवाई केली जात आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ अखेर जिल्ह्यातील तब्बल दोन लाख बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यांना तब्बल १२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड झाला आहे. तरीदेखील अजूनही नियम पाळला जात नाही, हे विशेष.

जिल्ह्यात २० लाखांवर वाहने

पूर्वीच्या काळातील बैलगाडी, सायकल, टांगा ही दळणवळणाची साधने काळाच्या ओघात संपली. आता प्रत्येकाला स्वत:चे वाहन असावे, असे वाटू लागले आहे. छोट्या-छोट्या कारणांसाठी वाहन वापरले जाते. त्यातून वाहनांची संख्या भरमसाठ वाढल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या २० लाख १८ हजार ५३९ वाहने आहेत. त्यात १३ लाखांहून अधिक दुचाकी, एक लाख ९२ हजार कार, २१ हजार रिक्षा, ५४ हजार ट्रॅक्टर्स आणि २२ हजार ट्रक व इतर वाहनांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दोन व्यक्तींमध्ये एक वाहन अशी स्थिती आहे. पूर्वी एका कुटुंबात एकच वाहन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT