anil parab - Copy.jpg 
सोलापूर

परिवहनमंत्री म्हणाले ! उद्योग अन्‌ बससेवा सुरु करण्याचे नियोजन पण... 

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरात 22 मार्चपासून लॉकडाउन असून आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने राज्यातील तब्बल तीन लाखांपर्यंत उलाढाल ठप्प झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता 22 एप्रिलनंतर टप्प्याटप्याने लॉकडाउन शिथील करुन उद्योग व परिवहन सेवा सुरु करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला जाणार असून केंद्राच्या मान्यतेनुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 

लॉकडाउननंतर मुंबईतील अत्यावश्‍यक सेवेसाठी मुबलक प्रमाणात बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. आता राज्यातील बहूतेक जिल्ह्यांमध्ये अत्यावश्‍यक सेवेसाठी बससेवा सुरु करण्याचे नियोजन झाले असून मागणीनुसार बस उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही परिवहनमंत्री परब म्हणाले. राज्यातील कोणत्या सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित जिल्ह्यांमध्ये बससेवा सुरु करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 22 एप्रिलनंतर राज्यातील उद्योग टप्प्याटप्याने सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्याचे नियोजन (प्रस्ताव) केंद्र सरकारला पाठविले जाईल आणि केंद्र सरकारकडून ज्या पध्दतीने मान्यता मिळेल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


अत्यावश्‍यक सेवेसाठी बस उपलब्ध 
लॉकडाउनच्या कालावधीत ज्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्‍यक सेवांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस लागणार असतील, तर त्या उपलब्ध करुन दिल्या जातील. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यावश्‍यक असून बससेवा सुरु करण्याबरोबरच उद्योग सुरु करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल पाठविला जाईल. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमध्ये बस अथवा उद्योग सुरु करणे सुरक्षित आहे, अशा ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. 


मुंबईत अत्यावश्‍यक सेवेसाठी 350 बस सुरु राहतील 
मंत्रालयातील विविध कामांसाठी 10 टक्‍के कर्मचारी वाढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार त्या भागात अतिरिक्‍त बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मुंबई भागात अत्यावश्‍यक सेवेसाठी एकूण 350 बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 30 टक्‍के कर्मचारी वाढीचा निर्णय अद्याप झालेला नसून 10 टक्‍के कर्मचारी वाढणार असल्याने त्याप्रमाणात बस उपलब्ध करुन देण्याचे नियोजन झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT