kanda.jpg 
सोलापूर

ग्राहकांना कांदा स्वस्त अन शेतकऱ्यांना दुप्पट भावाने बियाणे विक्री 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: येथील बियाणे बाजारपेठेत या वर्षी कांदा बियाणांचे दर सरळ दुपटीने वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. उत्पादित केलेल्या कांद्याच्या दरापेक्षा बियाणांचे दर अधिक झाल्याने शेतकऱ्यांना महाग दराने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे. मागील वर्षी बियाणे उत्पादक कंपन्यांनी जादा दराने केलेल्या बियाणे खरेदीचा फटका या हंगामात शेतकऱ्यांना बसला आहे. 

कांदा बियाणांची किंमत साधारण अत्यंत कमी असते. मागील वर्षी कांदा बियाणे एक हजार 200 रुपये बॅग असे होते. बियाणांची किंमत कमी असेल तर कांदा जास्त दराने विकून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने परवडतो. मात्र, यावेळी हा प्रकारच अगदी उलटा झाला. कांद्याचे दर अगदी कमीत कमी 13 रुपयांपासून 20 रुपये प्रतिकिलो एवढे होते. या हंगामासाठी कांदा बियाणे कमी भावात मिळेल असा अंदाज होता. 

मात्र, सर्वच बियाणे कंपन्यांनी कांदा बियाणांचे दर थेट दोन हजार 200 रुपये प्रती किलोवर नेऊन ठेवले. तेव्हा शेतकऱ्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. एक हजार रुपयांची वाढ बियाणे दरात झाली. बियाणे उत्पादक कंपन्यांनी मागील वर्षी बियाणे खरेदीचे करार जास्त दराने केले होते. त्यावेळच्या बाजारभावाने हे व्यवहार झाले होते. हे बियाणे या हंगामासाठी बाजारात आल्याने त्याला जादा दर लावण्यात आले. 
याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. या वर्षी खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे घ्यावे लागले आहे. बियाणे महाग दराने घेतले तर पुढे उत्पादित झालेल्या कांद्याला त्या तुलनेत जादा दर भेटले तरच हा व्यवहार शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात बियाणे दरवाढ सोसावी लागणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी पत्रकारांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? भारतावर विश्वास का ठेवावा? पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी दिले सडेतोड उत्तर

Everest Base Camp Trek: २१० किलोमीटरचा खडतर हिमालयीन प्रवास; आळंदी-पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांचा साहसी पराक्रम, १६ दिवसांचा थरारक प्रवास पूर्ण..

Ajit Pawar NCP: महाराष्ट्रात नवा ‘राजकीय चाणक्य’ सक्रिय! अजित पवारांच्या पक्षात मोठे बदल, प्रशांत किशोर यांची पुण्यात एंट्री

Mumbai News: वांद्र्यात रेल्वेचा बुलडोझर! गरीबनगरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई; परिसरात तणावाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT