traffic police sakal
सोलापूर

Solapur : वाहतूक पोलिस दलातील प्रत्येक अंमलदाराला दररोज २० वाहनांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट

कारवाईवेळी थांबा; नाहीतर दीड हजारांचा दंड; शासकीय कर्मचाऱ्यांवरील कारवाई सैल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - शहर वाहतूक पोलिस दलातील प्रत्येक अंमलदाराला दररोज २० वाहनांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सर्व कागदपत्रे असली तरी हेल्मेट नसल्याचा दंड तर हमखास होतोच. दुसरीकडे पोलिस मुख्यालय असो वा पोलिस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांवरील हेल्मेट सक्तीची कारवाई आता बंद झाली की काय, अशी स्थिती आहे.

सोलापूर शहरात येताना जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता खराब झाला आहे. याच मार्गावर वाहतूक पोलिस नियमितपणे न चुकता थांबलेले असतात. तो रस्ता खराब असतानाही अंमलदार रस्त्यात अडवे येऊन वाहने थांबवितात.

पुढे पुण्याहून सोलापुरात येताना जुना पुना नाका परिसरातील पुलाखाली देखील वाहतूक अंमलदार असतात. उतारावरून येताना पुढे वळण रस्ता आहे, तरीदेखील त्याठिकाणी बिनधास्तपणे वाहने अडविली जातात. वाहनचालकांनी शिस्त पाळलीच पाहिजेच, जेणेकरून अपघात होणार नाही.

पण, केवळ दंडवसुली हा एकमेव हेतू न ठेवता प्रबोधन देखील आवश्यक आहे. अंमलदारांना टार्गेट देऊन कारवाई न करता बेशिस्तांवर सरसकट कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातून अनेक चारचाकी वाहनांसमोर ‘पोलिस’ फलक ठेवलेला असतो, त्यांच्यावर मात्र कारवाई होताना दिसत नाही. अनेकजण विनाहेल्मेट ये-जा करतात, त्याकडे दुर्लक्ष करून अडविलेल्याकडे सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेट नाही म्हणून दंड केला जातो,

अशीही काही उदाहरणे आहेत. दुसरीकडे काही अंमलदारांकडेच हेल्मेट नाहीत, असेही बोलले जाते. पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडे तरी हेल्मेट असावे, ते पाहून इतरांनाही सवय होईल म्हणून काही दिवसांपूर्वी त्यासंबंधीचा फतवा काढला. पण, काही दिवस त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, पण आता स्थिती ‘जैसे थे’ आहे.

सिग्नल’वर दिसेना वेळ

शहरात जवळपास १२ ते १६ सिग्नल सुरु असून त्यातील बहुतेक सिग्नलवर अलीकडे वेळच दिसत नाही. त्यामुळे कधी सिग्नल सुटतो आणि कधी पडतो, हेच वाहनचालकांना समजत नाही. रंगभवन चौकातील सिग्नल तर नेहमीच सुरु असतो, पण त्याठिकाणी वाहने थांबतच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. सिग्नलची दुरुस्ती अद्याप झालेली नाहीत.

पळून जाऊ नका, नाहीतर वाढीव दंड

वाहतूक अंमलदार वाहनाला अडवित असल्यास चकवा देऊन पळून जाऊ नका, नाहीतर आपल्या वाहनाचा काढलेल्या फोटोवरून ५०० रुपये आणि पळून गेल्याने दीड हजार रुपये त्याशिवाय जादा दंड होईल. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे. आपल्याच सुरक्षिततेसाठी त्यांचा प्रयत्न असतो.

बेशिस्तांना असा दंड...

हेल्मेट नाही - ५०० रुपये

मोबाईल टॉकिंग - १००० रुपये

ट्रिपल सीट - १००० रुपये

फॅन्सी किंवा नंबरप्लेट नाही - ५०० रुपये

परवाना नाही - ५००० रुपये

शहरात वाढले १८ वर्षांखालील वाहन चालक

सोलापूर शहरातील अनेक महाविद्यालये व क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती दुचाकी दिसते. त्यातील अनेकजण १८ वर्षांखालील आहेत. पालकांनीही मुलाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला हवे, नाहीतर तीन वर्षांची शिक्षा व मोठा दंड होवू शकतो. अशांवर वाहतूक अंमलदारांचाही वॉच हवा.

दरम्यान, परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलाला पाच हजार आणि वाहन मालकाला पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड होतो. दुसरीकडे १८ वर्षांवरील तरुणाकडे वाहन आहे, पण परवाना नसलेल्यांना पाच हजारांचा दंड होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT