ujani  esakal
सोलापूर

Solapur News : उजनीतून ना शेतीला ना पिण्यासाठी पाणी

धरणाच्या ४३ वर्षांत आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक; पंढरपूरचा निर्णय उद्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर- पावसाळा आता महिनाभरच राहिला आहे, तरीदेखील उजनी १८ टक्क्यांवरच आहे. त्यामुळे धरणाच्या ४३ वर्षांच्या इतिहासात आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक असल्याने उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन सध्या ना पिण्यासाठी ना शेतीसाठी पाणी, अशी भूमिका घेतली जात आहे.

आता पंढरपूर व सोलापूर शहरासाठी साधारणत: २० सप्टेंबर दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार असून, गुरुवारी (ता. ७) पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील त्यावर अंतिम निर्णय घेतील.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह धाराशिव, कर्जत-जामखेड, बार्शी, कुर्डुवाडी, करमाळ्यासह जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक ग्रामपंचायती व सहापेक्षा अधिक ‘एमआयडीसीं’ना आणि अंदाजे २० लाख शेतकऱ्यांना उजनीचाच आधार आहे. १९८० धरणाच्या इतिहासात २०१५-१६ वर्ष संस्मरणीय१९८० मध्ये पहिल्यांदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले.

धरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि सर्वत्र हरितक्रांती होण्यास मदत झाली. मात्र, २०१५-१६मध्ये पावसाळा संपला तरीदेखील धरणात १४.६० टक्के पाणीसाठा होता. उन्हाळ्यात धरण उणे ५९ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यावर्षी धरण एवढ्या खालीपर्यंत गेले होते. आता यंदाही तशी परिस्थिती उद्‌भवू शकते म्हणून पाणी सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीपुढे हा इतिहास मांडला जातोय.

सर्वांत कमी पाणीसाठ्याची वर्षे

(१५ ऑक्टोबरपर्यंत)

वर्ष पाणीसाठा

१९८७-८८ ५७.०७ टक्के

१९९५-९६ ५७. ८१ टक्के

१९९९-२००० ४३.१५ टक्के

२०००-०१ २८.८४ टक्के

२००१-०२ ४३.१५ टक्के

२००२-०३ उणे ७ टक्के

२०१२-१३ १६.२८ टक्के

२०१५-१६ १४.६० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT