solapur sakal
सोलापूर

यंदा पाणी टंचाई नाही! पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी सव्वादोन मीटरने वाढली; माढा, मोहोळ, उत्तर सोलापुरात सर्वाधिक वाढ; उजनी धरण १०० टक्के

यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. भीमा, सीना अशा सर्वच नद्यांना महापूर आला होता. विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. उजनी धरणही १०० टक्के भरलेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी सव्वादोन मीटरने वाढल्याचे भूजल सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. भीमा, सीना अशा सर्वच नद्यांना महापूर आला होता. विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. उजनी धरणही १०० टक्के भरलेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी सव्वादोन मीटरने वाढल्याचे भूजल सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

भूजल सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात माढा तालुक्याची भूजलपातळी ३.२३ मीटरने वाढली आहे. त्याखालोखाल उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याची भूजलपातळी अडीच मीटरने वाढल्याचे दिसून आले. गतवर्षी जिल्ह्यातील १४० हून जास्त गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. उजनी धरणाचीही पातळी उणे ४० टक्क्यांपर्यंत गेली होती. पाणी पातळीत दीड मीटरने घट झाली होती. पण, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात बार्शी, करमाळा हे दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांची भूजलपातळी दोन ते सव्वातीन मीटरपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.

भूजलपातळी मोजण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १५८ विहिरींचा सर्व्हे करण्यात आला, त्यातून हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ३.९० मीटर राहिली आहे. यंदा सप्टेंबरमधील भूजलपातळी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली असल्याचेही भूजल सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय वाढलेली भूजलपातळी (मीटरमध्ये)

  • तालुका वाढलेली पातळी

  • माढा ३.२३

  • उत्तर सोलापूर २.५६

  • मोहोळ २.५४

  • दक्षिण सोलापूर २.३६

  • सांगोला २.३१

  • अक्कलकोट २.२५

  • सरासरी २.२४

  • मंगळवेढा २.१६

  • माळशिरस २.११

  • पंढरपूर २.०१

  • बार्शी १.७७

  • करमाळा १.४१

पाणी पातळीत चांगली वाढ

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील भूजलपातळी तपासली. त्यानुसार यंदा सर्वच तालुक्यातील भूजलपातळी वाढली आहे. पाणीपातळी वाढल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार नाही, असा विश्वास आहे.

- मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेस्सी आला अन् ५ मिनिटात गेला... चाहते हजारो रुपये खर्चूनही पाहू शकले नाहीत; ममता बॅनर्जींनी माफी मागत दिले चौकशीचे आदेश

Solapur ZP School: सोलापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये ९५७ शाळांची पटसंख्या वाढली, ५,३९७ नवीन विद्यार्थी

Mumbai Crime: टोपीवरून वाद पेटला; व्यक्तीनं गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारली, होत्याचं नव्हतं झालं अन्... परिसरात हळहळ

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: आश्वासन फसवे ठरल्याचा आरोप करत युवा प्रशिक्षणार्थी सरकारविरोधात रस्त्यावर

SCROLL FOR NEXT