शाळा Esakal
सोलापूर

उन्हाळी सुटीत दररोज दोन तासांची शाळा! मुलांना लेखन-वाचनाचे धडे

शाळा बंद राहिल्याने त्यांना शिक्षण घेता आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता उन्हाळा सुटीत दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान दोन ते तीन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शाळा बंद राहिल्याने त्यांना शिक्षण घेता आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता उन्हाळा सुटीत दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान दोन ते तीन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत.

9 मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग पूर्णपणे बंद राहिले. तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून पहिलीपासूनच्या सर्वच शाळा उघडण्याचा निर्णय झाला. लाखो विद्यार्थी अजूनही शाळांमध्ये येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, कोरोना काळात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणावर बालविवाह लावून देण्यात आले आहेत. तर अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले असून ते आता बालमजूर म्हणून इतरत्र काम करू लागल्याचेही चित्र आहे. कोरोनामुळे विस्कटलेली प्राथमिक शिक्षणाची घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सुटीतही शाळा भरवाव्यात, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्‍त केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्हा परिषदांना त्यादृष्टीने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. राज्यातील जळगाव, नगर, नाशिक या जिल्ह्यांनी दुसरी ते सातवीपर्यंतच्या शाळा (वर्ग) उन्हाळी सुटीत किमान दोन-तीन तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सोलापूर जिल्हा परिषदेनेही निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी मेपासून केली जाणार आहे.

उन्हाळा सुटीत विद्यार्थ्यांना किमान दोन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासंबंधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे. आता मार्चनंतर शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सव्वा कोटी विद्यार्थ्यांना होईल लाभ
राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांची संख्या 99 हजार तीन इतकी आहे. त्याअंतर्गत जवळपास 79 लाख विद्यार्थी शिकत आहेत. दुसरीकडे, पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये 32 लाखांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. पण, हातावरील पोट असलेल्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाइल नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. दुसरीकडे, बहुतेक पालकांनी ऑनलाइन शिक्षणाचा विपरीत परिणाम जाणवू लागल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले होते. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आता उन्हाळा सुटीत दररोज दोन तासांची शाळा भरविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT