Ujanis water  Esakal
सोलापूर

उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरशः झोपच उडाली आहे.

राजाराम माने

जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरशः झोपच उडाली आहे.

केतूर (सोलापूर) : सोलापूर पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाचा पाणीसाठा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेला म्हणजेच 111 टक्के असतानाही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो केवळ 20 टक्‍क्‍यांवर आला आहे. जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरशः झोपच उडाली आहे.

गतवर्षी पुणे जिल्हा व परिसर तसेच भीमाखोऱ्यात झालेल्या जोरदार पावसाच्या बळावर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही. या भरवशावर निर्धास्त होता. परंतु सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्याने पुन्हा एकदा पाण्याचे संकट सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी जलाशयाच्या पाणीसाठा सध्या 20 टक्के वरच आला आहे.

पाणीसाठा वरचेवर झपाट्याने कमी होत असल्याने लाभ क्षेत्रातील, सखल भागातील शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मोठी धावपळ व पळापळ सुरू झाली आहे. पाईप, केबल, मोटारी पाणी पुढे जाईल. तसतसे वाढवावे लागत आहेत. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जलाशयाचा पाणीसाठा मायनस मध्ये जाणार असल्याने शेतकरी हबकून गेला आहे. उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत असताना व पिकांना पाण्याची गरज असताना पाणीसाठा मात्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी धावपळ पळापळ सुरू आहे. आगामी काळात पिके वाचविण्यासाठी शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"पावसाळ्यात पाणी साठा भरपूर असतानाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

- हरिश्चंद्र खाटमोडे, केतूर

" इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या धरणग्रस्त इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे, त्याप्रमाणेच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांसाठी पाणी राखीव ठेवणे गरजेचे झाले आहे.

- अँड. अजित विघ्ने, केतूर

" धरण निर्मितीसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या नशिबी ४० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष कायम ठरलेलेच आहे. यात बदल होणे गरजेचे आहे .

- अशोक पाटील, केतूर

" सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी विरोध नाही परंतु पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळून पाणी वाया न घालवता पाणी जपून वापरावे असेच वाटते.

- श्रीकांत साखरे, राजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT