BELGAUM
BELGAUM SAKAL
पश्चिम महाराष्ट्र

सहा कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

खानापूर : खानापूर अग्निशामक दलाने जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात आगीच्या ६६ वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ कोटी ७ लाख २४ हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्याचे कार्य केले आहे. तर सात बचावकार्य करून आठपैकी दोघांना वाचविले आहे.

तालुक्याला मोठे वनक्षेत्र असून दरवर्षी वणव्याच्या घटना घडतात. यात प्रामुख्याने गवळी समाजाच्या झोपड्या आणि ऊस पीक मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. अलीकडे दरवर्षी पूर येत असल्याने अग्निशमन दलावरील भार वाढला आहे. रुमेवाडीत असलेल्या अग्निशामक दलाच्या कार्यालयात २२ कर्मचाऱ्यांसह दोन सुसज्ज वाहने आहे. या कार्यालयातर्फे शहरासह २१७ खेड्यांना सेवा दिली जाते. अपुऱ्या मनुष्यबळावर ही सेवा दिली जाते.

तालुक्यात २०२० मध्ये आगीच्या ३५ घटना घडल्या. त्यात ३९ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले तर २ कोटी ४४ लाख ६० हजार ५०० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आले. या काळात पाच बचावकार्ये राबविण्यात आली. त्यात सहापैकी एका व्यक्तीला वाचविण्यात यश आले. २०२१ मध्ये आतापर्यंत आगीच्या ३१ घटना घडल्या. त्यात ४ लाख २६ हजार ५०० रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली तर ३ कोटी ६२ लाख ३ हजार ५०० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात दलाला यश आले. तसेच दोन बचावकार्यात तिघांमधील एकाचे प्राण वाचविण्यात आले. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात दर पावसाळ्यात पूर येतो आहे. यावेळी एनडीआरएफ पथक तात्काळ येणे शक्य नसते. त्यावेळी पुरापासून लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी अग्निशामक दलावर येऊन पडली आहे. मात्र, त्यांना शासनाकडून पुरेशा बोटी आणि बचावकार्य करण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT