Raju Shetti
Raju Shetti  esakal
पश्चिम महाराष्ट्र

'ऊस वाहतूकदारांचे प्रश्‍न न सोडवल्यास हंगाम बंद'; शेट्टींचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

राज्यामध्ये एकूण ९ लाख ऊसतोडणी मजूर आहेत. या मजुरांची मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.

सांगली : राज्यातील साखर कारखानदारी ऊस वाहतूकदारांच्या मजबूत खांद्यावरती तारलेली आहे. वाहतूकदारांसमोर आज संकट उभे राहिल्यामुळे त्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. वाहतूकदारांची चाके ज्यादिवशी थांबतील त्यादिवशी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी मातीमोल होईल. यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्यातील सर्व ऊस वाहतूकदार डिसेंबर व जानेवारीमध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम बंद करतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे दिला.

सांगलीतील मार्केट यार्डातील सहकार भवनमध्ये आज ऊस वाहतूकदार संघटनेचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, संजय बेले, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे आदिंची उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, ‘‘साखर उद्योगामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या राज्य साखर संघाने आजपर्यंत कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. राज्यामध्ये एकूण ९ लाख ऊसतोडणी मजूर आहेत. या मजुरांची मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. हे मजूर व वाहतूकदार म्हणजे साखर उद्योगातील कणा असूनही साखर संघाने व सरकारने त्यांच्या दुर्लक्ष केले आहे. त्यांना उपेक्षित ठेवले आहे. ऊसतोडणी मजुरांचे महामंडळ करण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा २००७ मध्ये विधानसभेत केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने काही वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळांची स्थापना केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसातून वर्षाला १०० कोटी रुपयांचा निधी कपात करून महामंडळाला ऊर्जितावस्था आणलेली आहे. मात्र महामंडळाचे कामकाज कशापद्धतीने होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. ऊस वाहतूकदारांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून त्याची कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. महामंडळाकडून ऊस तोडणी मजुरांना बांधकाम कामगारांप्रमाणे आरोग्य विमा, पेन्शन, साहित्य पुरवठा, कायदेशीररीत्या सरंक्षण दिले पाहिजे. महामंडळाकडे मजुरांची नोंदणी करून वाहतूकदारांना महामंडळाकडून मजूर पुरवठा केल्यास वाहतुकदारांची फसवणूक होणार नाही.’’

मेळाव्यास धनाजी पाटील, माधव पाटील,भागवत जाधव, बाबा सांद्रे, सुभाष साळुंखे, श्रीपाल वडगावे, नामदेव सोन्नूर, ललन मिठारे, धनाजी पाटील, मनोज साळुंखे, प्रदीप चौगुले, शिवाजीराव माने-देशमुख यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ऊस वाहतूकदार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT