Suggestion to impart education lessons to students in rural areas through Vidyagam Yojana 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यागम योजनेचा दिला आदेश मात्र शिक्षकांची अनास्था

मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिकविण्यासाठी शिक्षण खात्याने विद्यागम ही योजना हाती घेतली आहे. त्यानुसार शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यागम योजनेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे द्यावेत अशी सुचना करण्यात आली आहे. मात्र गावागावात कोरोनाचे रुग्ण आढळुन येत असल्याने विद्यार्थ्यांना एकत्र करुन शिकविण्याबाबत शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक शिक्षक गावात जाऊन शिकविण्यास प्राधान्य देत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 


शाळा कधी सुरु होणार याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणुन कार्य करावे तसेच योजनेनुसार प्रत्येक शाळेतील 20 ते 25 मुलांचा गट तयार करुन विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे अशी सुचना शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. तसेच विद्यागम योजना लागु करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे, विद्यागम योजनेचा विद्यार्थ्याना लाभ होईल असे मत व्यक्‍त होत आहे.

मात्र अनेक गावात कोरोना रुग्ण आढळुन येत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखत शिकविण्यचा निर्णय घेतला तरी योजनेनुसार प्रत्येक शाळेतील 20 ते 25 मुलांचा गट करुन शिकविण्यास काही शिक्षक तयार नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी अद्याप शिक्षणापासुन वंचीत आहेत. तसेच अनेक भागातील बससेवा पुर्ववत झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन शिकविण्यास शिक्षकांना अडचण होत आहे. 


1 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत प्रवेश द्यावा. विद्यार्थी व पालकांना शाळेत बोलावून शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन करावे. सामजिक अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करावी अशा सूचना शिक्षण खात्याने केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविण्यासाठी विद्यागम योजना लाभदायक ठरणार असली तरी वाढत्या रुग्ण संख्येमुळे योजना लागु करताना अनेक अडथळे येत असल्याचे दिसुन येत आहे. 

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरीही शाळा बंद असल्याने शिक्षक विद्यागम योजनेतंर्गत गावात जाऊन शिकवित असुन शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शिक्षक गावात जाऊन शिकवित असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. 
जयकुमार हेबळी, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना

संपादन ‌- अर्चना  बनगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT