Sujay Vikhe Patil thanked Pankaja Munde 
पश्चिम महाराष्ट्र

सुजय विखे पाटलांनी का मानले पंकजा मुंडेंचे आभार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे ते अडकून पडले आहेत. त्यांची उपासमार होत होती. मात्र, उसतोड कामगारांच्या प्रश्नामुळे राजकारण तापले होते. या प्रश्नात भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी उडी घेतली होती. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले होते. परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. सरकारला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालण्यास भाग पाडले.

ऊसतोड कामगारांना स्वगृही परत येण्यासाठी यशस्वी लढा दिल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मानले आहेत. 

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तसेच महाराष्ट्रातील ऊस तोड कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात अडकलेले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाला आहे.

अशावेळी ऊसतोड कामगारांना ऐन हंगामात अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. शासन निर्णय प्रलंबित होता व अशा वेळेला ऊसतोड कामगारांच्या वेदना सरकारच्या कानावर घालत, सरकारला निर्णय घ्यायला पंकजा मुंडे यांनी भाग पाडले. या ऊसतोड कामगारांना जो लढा दिला आणि त्यात त्या यशस्वी झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार खासदार डॉक्‍टर सुजय विखे पाटील यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकातच्या मार्फत व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT