Tenth examination of blind students The school management demand for concessions 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावामध्ये या विद्यार्थ्यांना हवी आहे दहावीच्या परीक्षेमधे सवलत.....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनासाठी खबरदारी म्हणून पाळावे लागणारे दोन मीटरचे शारीरीक अंतर दहावीच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरले आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी माहेश्‍वरी अंध शाळेने शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्याकडे केली आहे.

माहेश्‍वरी अंध शाळेचे 12 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी लेखनीक दिला जातो. वनिता विद्यालयाच्या नववीच्या विद्यार्थीनी दरवर्षी लेखनीक म्हणून अंध विद्यार्थ्यांना मदत करतात. परीक्षेवेळी त्याना एकाच बाकड्यावर बसविले जाते, त्यांच्यात एक फुटाचे अंतर असते. यावेळी कोरोनामुळे परीक्षार्थी व लेखनीक याना शारीरीक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

त्यामुळे यंदा नवी समस्या उद्भवली आहे. लेखनीक म्हणूून नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थींनी किमान दोन मीटर अंतरावर बसावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी सांगीतलेली उत्तरे लेखनीक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थींनींना नीट ऐकू जाणार नाहीत अशी भिती आहे. त्यावर शिक्षण खात्याने तोडगा काढवा असे माहेश्‍वरी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाला वाटते. 


 यंदा दहावीची परीक्षा 25 जूनपासून सुरू होणार आहे. 4 जुलै पर्यंत ती परीक्षा चालणार आहे. कोरोना व लॉक डाऊनमुळे ही परीक्षा तब्बल तीन महिने बिलंबाने होत आहे. परीक्षेला विलंब झाल्यामुळे दहावीच्या सामान्य मुलांवरही मानसिक ताण आला आहे. त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना परीक्षेसाठी तयार केले जात आहे. त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून सुरू आहे. पण अंध विद्यार्थ्यांच्या या समस्येबाबत शिक्षण खात्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

बेळगावातील माहेश्‍वरी अंध शाळेचे विद्यार्थी गेल्या 32 वर्षांपासून दहावीची परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे 32 वर्षे या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दरवर्षी येथील सिद्धरामेश्‍वर हायस्कूलमध्ये या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र असते. वनिता विद्यालयाच्या नववीच्या विद्यार्थीनीनाच लेखनीक म्हणून नियुक्त केले जाते. गेल्या 32 वर्षात अंध विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेवेळी कोणतीही समस्या आली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच समस्या उद्भवली आहे. शाळा व्यवस्थापनाने ही समस्या बेळगावचे जिल्हाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडेही मांडली आहे.

मंगळवारी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार बेळगावात आले होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विकास कलघटगी व मुख्याध्यापिका अनिता गावडे यानी त्यांची भेट घेवून निवेदन दिले. या समस्येवर तोडगा काढण्याची ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली. मास्क, सॅनिटायजर यांचा वापर करून परीक्षार्थी व लेखनीक यांच्यात दोन किंवा तीन फुटाचे अंतर ठेवण्यास मान्यता मिळाली तर ही समस्या सुटेल. पण आता शिक्षण खात्याने त्याला मंजुरी द्यायला हवी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना विरोधात रस्ता रोको

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT