Vishal Patil submitted written question to Speaker in Lok Sabha about sangli development Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : ‘सांगली करू चांगली’चं काय झालं? विशाल पाटीलांनी लोकसभेत मांडला अध्यक्षांकडे लेखी प्रश्‍न

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लेखी स्वरुपात त्यांनी भूमिका मांडली. त्यांना बोलण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी सांगलीत प्रचाराला आले होते. त्यांनी ‘सांगली करू चांगली’, असं म्हटलं होतं. मतदारांनी त्यावर विश्‍वास ठेवून दहा वर्षे त्यांचा उमेदवार लोकसभेत पाठवला. त्यांच्या आश्‍वसनाचं काय झालं? सांगली चांगली का झाली नाही? सांगलीचं विमानतळ आणि ड्रायपोर्ट का झालं नाही, असे सवाल खासदार विशाल पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी स्वरुपात मांडले.

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लेखी स्वरुपात त्यांनी भूमिका मांडली. त्यांना बोलण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र निर्धारित वेळेपूर्वी दोन तास अधिवेशन संपवण्याचा निर्णय झाला. त्याआधी त्यांनी लेखी स्वरुपात चर्चेत सहभाग घेत सांगली लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील महत्त्‍वाचे प्रश्‍न मांडले.

सांगलीच्या प्रश्‍नावर विशाल यांनी म्हटले आहे, की दहा वर्षांत सरकारने सांगलीचे विमानतळ, सांगलीच्या शेतमाल निर्यातीसाठी आवश्‍यक असलेले ड्रायपोर्ट, सांगली-मिरज-कुपवाड शहरांचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश, जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन योजनांची पूर्ती यावर काय केले? सांगलीने दहा वर्षांसाठी भाजपचा खासदार दिल्लीत पाठवला, ‘क्या मिला सांगली को?’

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी म्हटले आहे, की आता कोणी शेती करू इच्छित नाही. सरकार म्हणते, त्यांनी शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये दिले. मग, गेल्या दहा वर्षांत २४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? कारण, शेती परवडेना झालीय.

खत, बियाणांवरील कराचे ओझे वाढले आहे. शेतकऱ्यांची मुले शेतीतून बाहेर पडून नोकरी करू इच्छितात. परंतु, त्यांच्या वाटेत पेपरफुटीचे काटे पेरले गेले आहेत. खासगी शिक्षण महाग आहे, म्हणूनच ही मुले आरक्षण मागत आहेत. त्यातूनच आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर होतोय. त्याच्या मुळापर्यंत जाण्याची, मूळ दुखणे समजून घेण्याची सरकारची तयारीच दिसत नाही.

महाराष्ट्रात मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. आज महाराष्ट्रात ७५ हजार सरकारी पदे रिक्त आहेत. त्यावर भरती होताना दिसत नाही. जिथे भरती होते, तेथे पेपर फुटले जातात. पाच वर्षांत असे ४५ प्रसंग घडले आहेत, हे गंभीर आहे.

शिक्षणाला तोकडा निधी

खासदार विशाल पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेवरील जगभरातील अर्थसंकल्पांतील तरतुदींचा लेखाजोखा मांडत भारतात अत्यंत कमी प्रमाणात निधी शिक्षणासाठी खर्च केला जातोय, याकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले आहे, की भारतात फक्त २.८ टक्के एवढा निधी शिक्षणावर खर्च होतोय. तुलनेत अमेरिकेत ६.२ टक्के, संयुक्त राष्ट्रांत ५.५ टक्के, जर्मनीत ५ टक्के, नामिबियासारख्या आफ्रिकेतील देशात ९.६४ टक्के शिक्षणावर खर्च केला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT