पश्चिम महाराष्ट्र

मी चिंता करण्याचे कारण नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यात 100 वर्षे पाण्याचा प्रश्न कायम आहे. तो संपविण्यासाठी काही करायला हवे. येत्या आठ- दहा दिवसांमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन सगळे जण एकत्र बसून पाणीप्रश्‍नाचा निकाल लावू, असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले. पाणीप्रश्‍नासंबंधी रामराजेंचा उत्तम अभ्यास आहे. ते मार्ग काढतील आणि मार्ग काढल्यानंतर जे घडत नाही ते घडवायचं काम मी करेन, असेही त्यांनी नमूद केले.
 
पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग लि. या साखर कारखान्याच्या पोती पूजन व शेतकरी मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. त्या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. सुभाष एरम, सतीश सावंत, सत्यजितसिंह पाटणकर, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, बाळासाहेब सोळसकर, खटावच्या सभापती रेखा घाडगे, बाजार समितीचे सभापती विजय काळे, कल्पना खाडे, प्रा. कविता म्हेत्रे उपस्थित होते.

जरुर वाचा - एसटीला अभिमान तुमच्‍या प्रामाणिकतेचा
 
दुष्काळी खटाव तालुक्‍यात तिसरा साखर कारखाना काढण्याचं धाडस प्रभाकर घार्गे व सहकाऱ्यांनी केल्याचे कौतुक करून ते म्हणाले, ""दुष्काळी भागात टेंभू, उरमोडी, तारळी अशा विविध योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्याशिवाय हा धंदा परवडत नाही. त्यामुळे आणखी क्षेत्र वाढण्याची गरज आहे.'' 
केंद्र सरकारने कालच बैठक घेतली. त्यानुसार जगात मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखरेला चांगले दिवस आहेत. साखर कारखाना, वीज इथेनॉल यावर संशोधन करणाऱ्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. लवकरच मांजरी येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन त्यावर सर्व तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

नक्की वाचा - Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग
 
रामराजे म्हणाले, ""सिंचन योजनांच्या पाण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ठिबक सिंचन केले, तरच पाणी पुरणार आहे. पाणी जपून वापरा. जमिनीचा पोत राखा. अतिपाण्याने फलटण, बारामती भागात ऊस लावायचा की मीठागरे करायची हे ठरवायची वेळ आली आहे.'' प्रभाकर घार्गे म्हणाले, ""संकटावर मात करण्याची ऊर्जा शरद पवारांमुळे मिळते. गेल्या चार-पाच वर्षांत तालुक्‍याचे राजकीय, सामाजिक पतन झाले आहे. ते दुरुस्त करायला हवे.'' प्रदीप विधातेंनी मनोगत व्यक्त केले. संचालक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. सहअध्यक्ष मनोज घोरपडे यांनी प्रास्ताविकात कारखान्यातील तंत्रज्ञान व उत्पादनाबाबत माहिती दिली.

हेही वाचा - गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल 


फायदा करून घ्या... 

इथला पाण्याचा प्रश्‍न 100 वर्षांपासून आहे. तो संपविण्यासाठी काही करायला हवे. या कारखान्यामुळे फलटणच्या कारखान्याला धक्का बसणार नाही. त्यामुळे रामराजे तुम्ही किंवा मी चिंता करण्याचे कारण नाही. दिवस बदललेत. बदलत्या दिवसांचा फायदा करून घ्यायला पाहिजे, असा सल्ला श्री. पवार यांनी उपस्थितांना दिला.

जरुर वाचा -  जाणता राजा ही शिवछत्रपतींची उपाधी नव्हेच : शरद पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT