Farmer News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Farmer News : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल..; पुरात शेती उद्‌ध्वस्त झाली अन्...

Farmer News : घटनेची फिर्याद सचिन यांची पत्नी राणी यांनी अंकली पोलिस ठाण्यात (Ankali Police Station) दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सचिन आपली वडिलार्जित शेती कसून कुटुंब चालवत होते. शेती व इतर कारणासाठी त्याने सहकारी संस्थांमधून ८ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

मांजरी : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची घटना इंगळी (ता. चिक्कोडी) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. सचिन राजू पाटील (वय ३२) रा. इंगळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सचिन आपली वडिलार्जित शेती कसून कुटुंब चालवत होते. शेती व इतर कारणासाठी त्याने सहकारी संस्थांमधून ८ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, अलीकडे कृष्णा नदीला आलेल्या पुरात संपूर्ण शेती उद्‌ध्वस्त झाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची फिर्याद सचिन यांची पत्नी राणी यांनी अंकली पोलिस ठाण्यात (Ankali Police Station) दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवला आहे. सचिन यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ व दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा मुंबईच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर पोहोचला

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT