Kirit Somaiya sakal
पिंपरी-चिंचवड

तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या

‘राज्यातील ठाकरे सरकारला २३ महिने झाले आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः लुटले आहे. कोविड काळात उपचाराअभावी जनता मृत्यूमुखी पडत असताना सरकार भ्रष्टाचाराचे पैसे मोजत होते,’.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - किरीट सोमय्यांनी आज पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार व कुटुंबीयांसह नातेवाईकांचा सहभाग आहे. असाच प्रकार जालना सहकारी साखर कारखान्यात झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर आणि मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पत्नी रुपाली व सासरे पद्माकर मुळ्ये आणि तापडिया बिल्डर यांच्यात हा ४३ कोटी २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला. याबाबत आपण उद्या दिल्लीत जाऊन ईडी, प्राप्तीकर खाते, कंपनी व्यवहार मंत्रालय व सहकार मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘राज्यातील ठाकरे सरकारला २३ महिने झाले आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः लुटले आहे. कोविड काळात उपचाराअभावी जनता मृत्यूमुखी पडत असताना सरकार भ्रष्टाचाराचे पैसे मोजत होते,’’ असा घणाघाती आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी रविवारी पिंपरीत केला.

भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘महावसुली सरकारचे घोटाळे’ ही पुस्तिका माध्यमांना देऊन घोटाळेबाजांना सजा झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

गेल्या २३ महिन्यात ठाकरे सरकारने २४ घोटाळे केले आहेत. त्यांचा पाठपुरावा राज्य व केंद्र सरकारसह उच्च न्यायालय, लोकायुक्त, मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय हरित लवाद, ट्राय, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग यांच्याकडे सुरू आहे, असे सांगून सोमय्या म्हणाले, ‘‘गांजा व ड्रग्जला हर्बल वनस्पती म्हणण्याचा शरद पवार यांचा उद्देश काय होता? आयात दारूवर पन्नास टक्के कर कमी केला, त्याच्याशी याचा संबंध आहे का? याचे उत्तर पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यायला हवे. त्यांनी पेट्रोलवरील ३० टक्के कर कमी केल्यास राज्यात ते स्वस्त होईल. केंद्र सरकारप्रमाणे कर कमी केला आहे.’’

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचे खोटे सांगून राज्य सरकारमधील तीनही पक्षांचे नेते नौटंकी करत आहेत. त्यांचे मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रतार सननाईक, अजित पवार यांची नावे घेऊन सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT