ऊर्से, ता. २० : मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस रात्रीही कायम होता. अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर, काही गावांतील पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले. या स्थितीमुळे शाळांनाही सुट्टी देण्यात आली.
मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवन मावळातील पवना नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे नदीकाठावर असलेली भात खाचरे पाण्यात गेली आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे. आढे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाणी उकळून पिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री दहापासून धामणे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे ग्रामस्थांना दूरवरून फिरून जावे लागत आहे. गावातील दुग्धव्यावसायिक, कामगार, व्यावसायिक आदींना मोठा फटका बसला आहे.
BBD25B03353
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.