पिंपरी-चिंचवड

परतीच्या पावसाने भातशेती संकटात

CD

ऊर्से, ता. २७ : राज्यात मागील पाच महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी हवालदील झाला आहे. परतीचा पाऊस लांबल्यास
हाता तोंडाशी आलेले भाताचे पीक वाया जाण्याच्या भीतीने मावळातील शेतकरी चिंतित झाला आहे.
परतीच्या पावसाने मागील दोन आठवड्यापासून कधी वादळी वाऱ्यासह, तर कधी ढगांच्या गडगडाटासह थैमान घातले आहे. या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. कोकणात आणि मावळात भात शेतीची लागवड केली जाते. भात शेतीची आता कापणीसाठी तयारी सुरू झाली आहे. काहींनी तर मजुर घेऊन भात कापणी सुरू केली आहे, पण अचानक परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून कापलेल्या भाताचे नुकसान केले आहे.
पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यामुळे शेतातील भाताची पिके आता आडवी पडायला लागली आहे. तर उभ्या पिकाची कापणी करावी की नाही असा प्रश्न पडला आहे.

परतीचा पाऊस जास्त लांबल्यास पिकाला फटका बसू शकतो. त्यामुळे भात काढावे की नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
-ज्ञानेश्वर धामणकर, शेतकरी ऊर्से

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT