इंदोरी, ता. २६ : पीएमपी बससेवेची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम काही अंशी प्रवासी संख्येवर झाला आहे. यामुळे मावळातील प्रवासी आता लोकल रेल्वे किंवा खासगी रिक्षांचा पर्याय निवडत आहेत.
मावळात निगडीहून लोणावळा, वडगाव, नवलाख उंबरे, उर्से, टाकवे, तसेच तळेगावहून चाकण, आळंदी, देहू, कात्रज-वडगाव या प्रमुख मार्गांवर पीएमपी बससेवा कार्यरत आहे. परंतू बस भाडेवाढीमुळे प्रवासी नाराज झाले आहेत. थेट लोणावळा व चाकणला जाणाऱ्यांची तळेगाव एस.टी.बस स्थानकावर गर्दी वाढली आहे.
‘‘तळेगावहून वडगाव, कान्हे फाटा, कामशेत, लोणावळा तसेच सोमाटणे फाटा, देहुरोड, निगडी, इंदोरी, देहू,
आळंदी, खालुंब्रे, म्हाळुंगे, खराबवाडी, चाकणला जाण्यासाठी पीएमपी बसपेक्षा रिक्षाचे भाडे कमी आहे. तसेच हवे तेथे चढ-उतार करता येतो,’’ असे प्रवासी पोपट साळुंके, वासुदेव उबाळे, रवींद्र राऊत व पवन नाटक यांनी सांगितले.
तर, ‘‘सध्या तरी आम्ही रिक्षा भाडेवाढ करणार नाही. बस भाडे वाढीमुळे रिक्षा प्रवासी वाढले आहेत,’’ अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक पांडुरंग येवले, नवनाथ पानसरे व बाळकृष्ण येवले यांनी दिली.
काही प्रवासी पुन्हा रेल्वेकडे
नियमित रेल्वेने प्रवास करणारे काही प्रवासी सोयीचे म्हणून पीएमपी बसकडे वळले होते. पण, ते प्रवासीही पुन्हा रेल्वेकडे जाणे पसंत करत आहेत, असे सचिन दळवी, कौशिक नगरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.