पिंपरी-चिंचवड

देवी इंद्रायणी भागात गढूळ पाणी पुरवठा

CD

निगडी, ता. २० ः तळवडे येथील देवी इंद्रायणी भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पुरवठा होत असल्याने सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
देवी इंद्रायणी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. या परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हेच पाणी पिण्यास व दैनंदिन वापरासाठी वापरावे लागत असल्याने लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिक यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
महापालिकेचे संबंधित कर्मचारी निवडणुकीचे काम सुरू असल्याचे कारण पुढे करून प्रत्यक्ष दुरुस्ती व पाणी तपासणीचे काम करण्यास विलंब लावत आहेत, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, उलटी-जुलाब, ताप, त्वचारोग तसेच जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढला असून काही नागरिकांना आधीच त्रास सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांना खासगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत असून यासाठी दररोज सुमारे दहा हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसायटीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. महागाईच्या काळात हा आर्थिक बोजा नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ पाण्याची गुणवत्ता तपासणी, स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका तर आहेच, शिवाय टँकरसाठी रोज हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. एखादी मोठी आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास जबाबदार कोण?
-सचिन कुडापणे, तळवडे

लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिक रोज हे दूषित पाणी वापरत आहेत. महापालिकेने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रशासना विरोधात आंदोलन करावे लागेल.
-सचिन भालेकर, तळवडे

भूमिगत जलवाहिनी कुठे लिकेज् आहे. त्याचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तो पर्यंत पाणी गाळून घ्यावे व सहकार्य करावे. हे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच स्वच्छ पाणी नागरिकांना मिळेल.
-जयकुमार गुजर, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT