सोमाटणे, ता. २०ः पावसाचा जोर कमी झाल्याने कासारसाई, पवनाचा विसर्ग कमी केला असून आढले, पुसाणे, मळवंडी धरणाच्या सांडव्यातील विसर्गही कमी झाला. सोमवार व मंगळवार मावळात पडलेल्या मुसळधार पावसाने पवनमावळातील शंभर टक्के भरलेल्या पाचही धरणातून विसर्ग सुरु करावा लागला होता. विसर्गामुळे कासारसाई, पवना, आढले या तीनही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या. बुधवारी दुपारनंतर पावसाने पूर्ण उघडीप दिली, त्यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. सध्या कासारसाई धरणातील विसर्ग केवळ १०३६ क्युसेकने सुरु असल्याने नदीचा पूर ओसरला आहे. पवना धरणातील विसर्गही कमी करण्यात आला परंतु भातखाचरातून व डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग अजून कायम असल्याने पवना नदीची पूरस्थिती कायम आहे. पाऊस वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा बाळगावी, नदीकाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये, जनावरे नदीपासून दूर ठेवावीत, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.