सोमाटणे, ता.२४ ः भातास आवश्यक असलेला पाऊस पडल्याने इंद्रायणी भात निसवले असून सध्या पवन मावळात सगळीकडे भाताचा सुगंध दरवळला आहे.
यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताची मशागत करुन भाताचे बी पेरण्याला वेळच मिळाला नाही. परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने थोडीशी उघडीप दिली होती. या काळात शेतकऱ्यांनी तातडीने शेताची मशागत करुन बी पेरणी केली. या पेरणीनंतरच्या काळात सतत पाऊस पडत राहिल्याने भाताच्या रोपांची चांगली वाढ होऊन नेहमीप्रमाणे जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी वेळ न दवडता भात लावणीला वेगाने सुरुवात केली. भात लावणीनंतर पाऊस खंड न पडता सतत चालू राहिला. त्यामुळे सध्या भाताची वाढ निरोगी झाल्याने भात निसवण्यात आले असून चांगला वास दरवळला. भाताचे पीकही चांगली आले आहे. पवनमावळातील सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, गहुंजे आदींसह इतर गावांतील शेतजमीन ही काळी कसदार असल्याने भाताचे पीक चांगले आले असून नेहमीपेक्षा उत्पादन दुप्पटीने वाढेल, अशी माहिती मावळच्या कृषी विभागाने दिली.
PNE25V53056
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.