पिंपरी-चिंचवड

सणासुदीत वीजपुरवठा सुरळीत ठेवा खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

CD

पिंपरी, ता. २५ ः ‘‘सध्या सणासुदीचे दिवस असून या उत्सव काळात महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात,’’ असे निर्देश मावळचे खासदार तथा केंद्रीय स्थायी ऊर्जा समितीचे सभापती श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (ता. २४) महावितरण अधिकाऱ्यांना दिले.
महावितरणच्या पिंपरी कार्यालयात खासदार बारणे यांनी पिंपरी व भोसरी विभागाची आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे व अतुल देवकर यांच्यासह पिंपरी व भोसरी परिसरातील अभियंते उपस्थित होते.
बारणे म्हणाले, ‘‘महावितरणने केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची जनजागृती वाढवावी. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा. जेणेकरुन महाराष्ट्राचा क्रमांक देशात प्रथम येईल.’’
मोहननगर, आकुर्डी, विवेकनगर, पिंपरी व भोसरीसह अन्य भागांतील नागरिकांनी विविध समस्या मांडल्यास त्यांच्या तक्रारींची सोडवणूक वेळेत करावी. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या. काकडे, गायकवाड यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बारणे यांच्या हस्ते सूर्यघर योजनेतील ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात वीजमीटरचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

SCROLL FOR NEXT