पिंपरी-चिंचवड

वाहनचालकांचा बेशिस्तपणा पादचाऱ्यांच्या जिवावर

CD

चिखली, ता.१ : चिखली परिसराकडे जाणारा चिखली - आकुर्डी या मुख्य रस्त्याबरोबर देहू - आळंदी रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मागील महिन्यात कृष्णानगर चौकाजवळ लहान मुलासह एक महिला आणि एका व्यक्तीला प्राणाला मुकावे लागले. तरीही चालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष कायम आहे.
चिखली परिसराकडे जाण्यासाठी चिखली - आकुर्डी; तर मोशी आणि देहूकडून येण्यासाठी देहू - आळंदी हा मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर दररोजच तास न तास वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळते. रुंदीकरणासाठी चिखली - आकुर्डी रस्त्यावरील अतिक्रमणे सहा महिन्यांपूर्वीच हटविण्यात आली. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही. या रस्त्यावर अनेक ठिकाणी फाटे फुटतात. रस्त्यावरील साने चौकात मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती तसेच चिखली - आकुर्डीकडून येणाऱ्या वाहनांमुळे दररोजच कोंडी होत असते. नेवाळे वस्ती ते घरकुल सोनवणे वस्ती मार्गे तळवडे आणि चिखली गावाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मुख्य म्हणजे या रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. अनेकदा वाहतूक पोलिस ही गायब असतात. त्यामुळे, बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने ‘नो एन्ट्री’ मधून वाहने घुसवून वाहतूक कोंडीमध्ये भर घालतात. त्यामुळे, नेवाळे वस्ती परिसरामध्ये दररोज वाहतूक कोंडीही नित्याची बाब होऊन बसली आहे.
देहू - आळंदी मुख्य रस्त्यावर तर दररोजच वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर रांगा पाहावयास मिळतात. चिखली गाव येथील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. मात्र, नियम पाळण्याची तसदी कोणीही घेत नाही. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगामधून पाटीलनगर किंवा चिखली गावठाणाकडे जाण्यासाठी रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना; तर रस्ता ओलांडण्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. याच रस्त्यावर अनेक भाजी विक्रेते अनधिकृतपणे हातगाड्या उभ्या करून वाहतूक कोंडीला हातभार लावत असतात.
रस्ता रुंदीकरण होऊन सुद्धा वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. एखाद्या व्यक्तीला तातडीने जायचे असेल; तर देहू - आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रथम सामना करावा लागतो. त्यामुळे, कोंडी कमी व्हावी यासाठी मुख्य चौकात वाहतूक पोलिस असणे गरजेचे असून वाहनचालकांनी देखील वाहतुकीचे नियम आणि सिग्नल पाळणे आवश्यक आहे.
- वैभव मोरे, रहिवासी

साने चौक ते भाजी मंडई चौक यादरम्यान रस्ता ओलांडणे मोठ्या कसरतीची काम आहे. मुलांना शाळेतून घरी नेताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. साने चौक हा अतिशय गजबजलेला आणि वर्दळीचा आहे. मात्र, या चौकामध्ये सिग्नल नाहीत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांमुळे चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
- रोहिणी पवार, गृहिणी

याबाबत उपाययोजना चालू आहेत. जेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तेथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करुन सर्व ठिकाणची वाहतूक कोंडी दूर करण्यात येत आहे.
- रामचंद्र घाडगे, वरिष्ठ निरीक्षक, तळवडे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका फायनल किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज

Gold Rate Today : तुळशी विवाहादिवशी सोने झाले आणखी स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Soybean Procurement Nagpur: अखेर हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त ठरला; पोर्टल सुरू, नऊ केंद्रांना मंजुरी, सोमवारपासून नोंदणी

SCROLL FOR NEXT