सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ ः चाकण परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत राजगुरुनगर बार असोसिएशनने गुरुवारी (ता. ६) मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. पुणे-नाशिक (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा टप्पा आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा. म क्र. ५४८ डी) मार्गाच्या विस्तारणीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि त्यासाठी ठराविक मुदत निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
गेल्या सुमारे दोन दशकांपासून ही कामे रखडली आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, कामगारांना वेळेत पोहोचता येत नाही. कच्चा माल वेळेत मिळत नसल्याने उद्योजकांचे नुकसान होत आहे. अपघातांचे आणि जीवितहानीचेही प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिक तसेच उद्योजकांनी सरकारसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) वेळोवेळी निवेदने दिली आहेत. पण, आश्वासनांशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाला कंटाळून नागरिकांसाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय राजगुरुनगर बार असोशिएसनने घेतला आहे. भारतीय सविंधानाच्या कलम २२६ अंतर्गत नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, डॉक्टर, वकील आणि व्यावसायिक यांना भेडसावणाऱ्या कोंडीबाबत असोसिएशनचे अध्यक्ष वैभव कर्वे यांनी ही जनहित याचिका दाखल केली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.