सोमाटणे, ता.१७ ः गहुंजे पुलासाठी कोट्यवधीचा खर्च होऊनही रस्त्याअभावी शेतातील खड्ड्यातून प्रवासासाठी दुचाकीस्वारांची कसरत सुरुच आहे.
१९७५ साली पवना धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणी पवना नदीत वेगाने सोडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गहुंजे साकव पाण्याखाली जाऊन गहुंजे आणि साळुंब्रे या दोन गावाची दळणवळण सेवा चार महिने ठप्प होती. यावर पर्याय म्हणून पवना नदीवर नवीन पूल बांधावा अशी मागणी नागरिक मागील पाच दशकापासून करत होते. अखेर पाच दशकानंतर नागरिकांच्या मागणीला यश आले.
महापालिकेने गहुंजे पुलासाठी १४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या पैशातून पाटबंधारे विभागाने पुलाचे काम मे महिन्यात पूर्ण केले. काम पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या पुढील पाचशे मीटर अंतराचा रस्ता हा नागरिकांच्या शेतातून जात असून संबंधित व्यक्तींची रस्त्यासाठी संमती न मिळाल्याने रस्त्याचे काम अपूर्ण राहिले. अपूर्ण कामामुळे या पुलावरून मागील सहा महिन्यापासून चारचाकी वाहतूक बंद असून दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन शेतातील खड्ड्यांतून मार्ग शोधत प्रवास करत आहेत.
PNE25V77219
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.