सोमाटणे, ता. २८ : पावसाचा जोर ओसरला असला तरी मावळातील नद्यांची पूरस्थिती अद्याप कायम आहे. तसेच, शेतांतून वाहणारे पाणी अजूनही द्रुतगती मार्गावरून वाहत असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून मावळ परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवनमावळातील आढले, कासारसाई आणि पवना या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरीही शेतातील, भात खाचरातील, डोंगर उतारावरील पाणी वाहने सुरू असल्याने अद्याप या तीनही नद्यांची पूरस्थिती कायम आहे. आज पावसाचा जोर कमी झाल्याने व ऊन पडल्याने भात रोपांना दिलासा मिळाला असून पाण्यात बुडालेली रोपे उघडी झाली आहेत. त्यामुळे भात रोपांचे नुकसान सध्यातरी टळले असून, अनेक शेतकऱ्यांची लावणीला आलेली भात रोपे पावसामुळे पाण्यात बुडाली होती. त्यामुळे रोपे खराब होऊन भातलावणीची समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतु आज पावसाने उघडीप दिल्याने भात रोपे वाचली आहेत. आज शेतकऱ्यांनी पुन्हा भात लावणीला सुरुवात केली. या पावसामुळे शेतातील अतिरिक्त पाणी द्रुतगती मार्गावर वाहून आल्याने सध्या पाऊस उघडला तरीही द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामुळे आज आठव्या दिवशीही द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत परंतु सावकाश सुरू आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.