सोमाटणे, ता. ३० ः चांदखेड ते दारुंब्रे दरम्यानचा जिल्हा मार्ग क्र. १०५ गेल्या दहा वर्षांपासून अपूर्णच आहे. परिणामी, पावसाळ्यात विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना व नागरिकांना खड्ड्यांतून, चिखलातून वाट काढावी लागत आहे.
या मार्गाचे खडी डांबरीकरण १० वर्षांपूर्वी सुरू झाले होते. चांदखेड आणि दारुंब्रे या दोन्ही गावांच्या टोकांवर डांबरीकरण झाले असले तरी, मध्यभागातील सुमारे १०० ते १५० मीटरचा रस्ता काही शेतकऱ्यांच्या अडथळ्यांमुळे रखडलेला आहे. परिणामी, त्या भागातील माती आणि मुरूम वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येते. हा रस्ता दोन्ही गावांतील शेती क्षेत्रातून जात असल्याने शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, सध्याच्या खराब स्थितीमुळे शाळकरी मुले, नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मोठी वाहने या मार्गावरून जाऊ शकत नसल्याने चांदखेडहून दारुंब्रे येथे जाण्यासाठी मुळशी तालुक्यातील कासारसाईमार्गे वळसा घालावा लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो आहे. यासंदर्भात दोन्ही गावांतील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांशी तहसीलदारांनी संवाद साधावा, अशी मागणी केली आहे.
‘‘सध्या या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने काम अपूर्ण राहिले असून, निधी उपलब्ध होताच रस्त्याच्या खडी डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल.’’
- डी. एच. दराडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळ
PNE25V27430
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.