पिंपरी-चिंचवड

दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता खचला

CD

पवनानगर ता. २६ : पवन मावळाला शहराशी जोडणाऱ्या उर्से ते बौर रस्त्यावर पडलेला खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. पण, पहिल्याच पावसात रस्त्याला मधोमध खड्डा पडला आहे. तसेच काही ठिकाणी तो खचल्याने कामाबद्दल शंका निर्माण होत आहे. ठेकेदाराने उप ठेकेदार नेमल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बौर, सडवली, ओझर्डे आढे वरून उर्सेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या मार्गाने येणारी वाहने पुढे सोमाटणेहून पिंपरी-चिंचवड शहराकडे जातात किंवा उर्से खिंडीतून पुढे वडगाव अथवा तळेगावला जातात. याच रस्त्यावरून पवनानगर व कामशेतकडे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी व कामगारांसाठी व पवन मावळातील पश्चिम भागात जाणऱ्या आणि येणाऱ्या वाहन चालकांना हा पर्यायी रस्ता मिळाला. याशिवाय बौर आणि या गावातील सर्व वाड्या-वस्त्या, सडवली, ओझर्डे, सडवली गावांतून शहराकडे जाणाऱ्या नागरिकांचीही सोय झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे डांबरीकरण झाले. परंतु, पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला अन् स्वतःचाच घात करून घेतला; भारत ३ स्पिनर्स, २ फास्टर अन् १ ऑलराऊंडरसह उतरला

Dasara Festival: छत्रपतींच्या काळात कसा साजरा व्हायचा दसरा... इंग्रजांच्या तोफा द्यायच्या सलामी! ऐतिहासिक पत्र समोर

Maharashtra Sugar Season: 'साखर हंगामला दिवाळीनंतर सुरुवात'; शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्यांच्यादृष्टीने समाधानकारक निर्णय..

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन, 2014ला मोदींनी वाराणसीतून लढावं यासाठी बजावलेली महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT