पिंपरी-चिंचवड

काळेवाडीतील चौक वाहतूक कोंडीची केंद्रे

CD

काळेवाडी, ता. १३ : काळेवाडी येथील तापकीर चौकासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी फाटा चौक हे वाहतूक कोंडीची केंद्रे ठरत आहे. दररोज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रहाटणी फाटा चौकापर्यंत दोघे बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र पोलिस आणि महापालिका प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
काळेवाडीतील रहाटणी चौक, तापकीर चौक, नखाते चौक हे महत्त्वाचे तीन चौक सायंकाळी वाहतूक कोंडीने अडचणीत येत आहेत. त्यामध्ये मुख्य बीआरटीएस रस्त्यावरील तापकीर चौक हा महत्त्वाचा चौक मानला जातो. मात्र आता तो वाहतुकीस खोळंबा ठरू पाहत आहे. त्यामुळे तापकीर चौक ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी परिस्थिती सध्या झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, वाहतूक पोलिस व महानगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचे दिसून येत असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाविरोधात तक्रार केली आहे.
तापकीर चौकातून एका बाजूला थेरगाव रुग्णालय ते डांगे चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता असून दोन्ही बाजूला हिंजवडी ते मोशी ऑटो क्लस्टरकडे जाणारा रस्ता; तर दुसऱ्या बाजूने ऑटो क्लस्टरकडून हिंजवडीकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत रहदारीचा व विविध भागांत जाण्यासाठी एक जवळचा मार्ग ठरत आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण सिग्नल असूनही वाढले आहे.


पोलिसांकडून दुर्लक्षित
काळेवाडी येथील मोठा परिसर हा अजूनही सांगवी वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येत असून आधीच सांगवी, पिंपळे गुरव व पिंपळे निलख परिसरातील विविध ठिकाणी सांगवी पोलिसांकडून करण्यात येत असलेली वाहतूक व्यवस्था अपुरी ठरत आहे. सांगवीपासून जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर काळेवाडी परिसर येतो. मात्र, तो वाहतूक नियोजनात दुर्लक्षित राहत आहे. तेथे वाहतूक पोलिस कर्मचारी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ न केली जात नाही. मात्र दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेवरील ताण मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.

समस्या अन् उपाय
- अशास्त्रीय वाहतूक नियोजन वाहतूक कोंडीस कारण
- सिग्नल तोडण्याचे सर्रास प्रकार, वाहन चालकांची मुजोरी
- बीआरटीएसच्या लोखंडी कठड्यांमुळे कोंडीत भर
- पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता
- सिग्नलची वेळ वाढवण्याची तसेच चारही बाजूला गतिरोधकांची गरज
- सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी यंत्रणा हवी
- सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत जड वाहनांना कायमस्वरूपी बंद करणे


काळेवाडीत सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा ठरतो आहे. अवघे ५०० ते ७०० मीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. वाहनचालक कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
- गणेश सोनवणे, वाहनचालक

रस्त्याच्या एका बाजूला शाळा; तर दुसऱ्या बाजूला हातगाडीवाले, भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण त्यातच वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.
- निर्मला पाचपांडे, रहिवासी, काळेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘चहा-समोसा...!’ असा आवाज आता रेल्वे स्थानकांवर ऐकू येणार नाही; विक्रेत्यांचा आवाज थांबणार, प्रवाशांसाठी नवी योजना

Gadchiroli Solar School : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम!

Bee Attack : धान कापणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Ambegaon News: भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात; जालना जिल्ह्यातील १७ भाविक जखमी!

Shegaon News : शेगाव मध्ये कार मधून जाणारी दहा लाख रोकड पकडली; निवडणूक विभागाच्या पथकाची कार्यवाही

SCROLL FOR NEXT