pune sakal
पुणे

बदलीच्या ठिकाणी रुजू न अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - आयुष प्रसाद

महालसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी प्रसाद जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत बदली करण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी विहित वेळेत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांचा ऑगस्टचा पगार काढता येणार नाही. नोकरीत सेवाखंड पडेल. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या बाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

महालसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. नारायणगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एक महिन्यांपूर्वी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. काही ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा प्रश्न या वेळी पत्रकारांनी उपस्थित केला.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदे अंतर्गत ७३ प्रवर्ग आहेत. कालमर्यादा पूर्ण झाल्यामुळे अथवा विनंती नुसार काही कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एक महिन्या पूर्वी करण्यात आल्या आहेत. या मध्ये ग्रामसेवकाचा समावेश आहे. बदली आदेश झाल्यानंतर रुजू होण्यासाठी विहित कालावधी असतो. या कालावधीत रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा जुन्या ठिकाणी पगार काढता येणार नाही. पगार काढल्यास आर्थिक अनियमितता झाल्यास वसुली व अन्य कारवाईस कर्मचारी व पगार काढणारा अधिकारी कारवाईस पात्र राहील.

बदली झालेल्या कर्मचाऱ्याचा ऑगस्टचा पगार रुजू झाल्यानंतर नवीन ठिकाणी काढला जाणार आहे. विहित कालावधीत रुजू न होणारे ग्रामसेवक व अन्य कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव फुले यांनी जारी केले आहेत. बदली आदेशाची कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी ताबडतोब हजर होण्याचे आवाहन या वेळी प्रसाद यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT