Vinit-Sinh 
पुणे

विनित सिंह यांना ‘अवसर पुरस्कार’

अक्षता पवार

पुणे - जागतिक तापमानवाढीमुळे मॉन्सूनचे चक्र बदललेले आहे. याचा परिणाम देशाच्या कृषी क्षेत्रावर आणि त्यावर अवलंबून उद्योगांवर होत आहे. मॉन्सूनच्या कालावधीत झालेला बदल आणि महासागराच्या घडामोडींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही गरज पाहता पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (आयआयटीएम) पीएचडी करत असलेल्या विनित सिंह यांनी याचा अभ्यास केला आहे. या संशोधनात्मक अभ्यासासाठी नुकतेच केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे (डीएसटी) त्यांना ‘अवसर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

विज्ञानाच्या क्षेत्रात पीएचडी करत असलेल्या देशातील १०० विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. ‘बदलत्या हवामानामुळे उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळ’ या विषयावर करत असलेल्या संशोधनासाठी विनितला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतात कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, मुंबई आदी किनारपट्टीवर दाट लोकसंख्या आहे. चक्रीवादळांमुळे या किनारपट्टीवरील जीवित आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यापूर्वी ऑक्‍टोबर १९९९ मध्ये ओडिशामध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे अशा प्रकारचा जीवित व मलामत्तेचे नुकसान झाले होते. मागील वर्षी बंगालच्या उपमहासागराच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या संख्या सर्वाधिक होती.

दरम्यान ही संख्या वाढण्यामागचे कारणसुद्धा या संशोधनातून समोर आले आहे. त्यामध्ये वातावरणीय परिस्थितीबरोबरच समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान यासारख्या परिस्थितींमुळे वारंवारता आणि तीव्रता या चक्रीवादळाच्या वैशिष्ट्यांना नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.

पीएचडीसाठी मला डॉ. रॉक्‍सी मॅथ्यू कोल आणि डॉ. मेधा देशपांडे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. तसेच या संशोधनासाठी मला त्यांनी सर्व प्रकारे मदत केली आहे. या संशोधनामुळे बदलत असलेल्या हवामानामुळे चक्रीवादळांवर कशा प्रकारे परिणाम होतो याची माहिती मिळेल. त्याबरोबर भविष्यात याचा वापर करण्यासाठी उपयोगी ठरेल.
- विनीत सिंह, आयआयटीएम पीएचडी विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT