Supriya Sule 
पुणे

प्रश्न सोडविण्यासाठी कुणाशीही बोलण्याची तयारी - सुळे

जिल्हा बॅकेत अतिशय चांगले कामकाज चालले आहे शेतकय्राच्या सहकार्यामुळे दौंड शुगर साखर कारखाना चांगला चालला असून इतरही कारखाने चालु करण्यासाठी आपले प्रयत्न होतील

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजे : तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यांचा विषय गंभीर आहे. परंतु लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कुणाशीही बोलण्याची आपली तयारी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. देऊळगाव राजे ( ता.दौंड ) येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने लिंगाळी मलठण जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये सुळे बोलत होत्या.

कार्यक्रमाला जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात,पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके,उपसभापती विकास कदम,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पंचायत समितीच्या सदस्या ताराबाई देवकाते, गुरूमुख नारंग,बादशहा शेख,मनिषा लव्हे,सरपंच स्वाती गिरमकर उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, जिल्हा बॅकेत अतिशय चांगले कामकाज चालले आहे. शेतकय्राच्या सहकार्यामुळे दौंड शुगर साखर कारखाना चांगला चालला असून इतरही कारखाने चालु करण्यासाठी आपले प्रयत्न होतील. जिल्हा परिषदेने केलेल्या चांगल्या कामकाजामुळे त्याचा कार्यअहवाल प्रकाशित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी आगामी निवडणुकीसाठी तयार रहाण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच साखर कारखाने डबघाईला आणल्याल्यांणी देशाचे सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याबद्दल आश्वर्य व्यक्त केले.

थोरात म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तालुक्याचा मोठा विकास झाला आहे. लिंगाळी मलठण या जिल्हा परिषद गटात मोठया प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. भिमा पाटसच्या कारभाराची ईडीच्या मार्फत चौकशी लावण्याची मागणीही त्यांनी केली. जगदाळे म्हणाले, दौंड शुगरच्या वतीने शेतकय्राची दिवाळी गोड करणार आहे. देऊळगाव राजे येथील बंधाय्राची दुरूस्ती व भिंतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चालुवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाण्याचे चांगले नियोजन केल्यामुळे तालुक्यात भीमानदी व कॅनालला पाणी कमी पडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आप्पासाहेब पवार,शिवाजी काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अमित गिरमकर यांनी केले. तर आभार विष्णुपंत सुर्यवंशी यांनी मानले. दरम्यान तालुका नियत्रंण विघुत समितीच्या सदस्यपदी अमित गिरमकर तर संजय गांधी निराधर योजनेच्या समिती सदस्यपदी नवनाथ थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT