Covid vaccination esakal
पुणे

लसीचा एकच डोस झाल्यास प्रवासादरम्यान चाचणीचे बंधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील तर, त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, एकच डोस झाला असेल तर प्रवासापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे दोन डोस झाले नसतील, त्यांनी प्रवास करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची विमानतळ अथवा रेल्वे स्थानकावर आरटीपीसीआर चाचणी करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

सध्या पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या लोहगाव विमानतळावर तेथील प्रशासनाकडून तर, रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून चाचण्या होत आहेत. रेल्वे स्थानकावर त्यासाठी महापालिकेची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी लसीचे दोन डोस घ्यावे आणि त्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे. अन्यथा त्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले. एकच डोस झाला असेल तर, आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT