bjp.jpg 
पुणे

'उद्धवजींवर माझं प्रेम, पण काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांना फसवतंय'

अमोल कविटकर

पुणे ः उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसवी आहे. निकषांच्या मुद्द्यावरून आमच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला गेला, पण या कर्जमाफीलाही निकष आहेत. २ लाख कर्ज थकलेला शेतकरी उरलाच नाही, मग कोणाची कर्जमाफी करणार? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.

दरम्यान, पुणे महापौर प्लॉगेथॉन २०२० या पुणे शहर स्वच्छ करणाऱ्या उपक्रमात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, ''उद्धजींबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर, पण त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीवाले फसवत आहेत. आम्ही मध्यम कर्जाची माफी केली होती, ती या सरकारने केली नाही. तुम्ही केवळ पीककर्ज माफ करता आहात का? काँग्रेसच्या बँका, कारखाने आणि सूतगिरण्या यातून सुटण्यासाठी ही कर्जमाफी आहे का. असा सवालही त्यांनी यावेळी केला.''

अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर  कर्ज घेतलेली असतात, ती रक्कम ते कारखाने वापरतात, त्याबद्दल काँग्रेसने अट घातली आहे. या कर्जांची रक्कम दोनशे कोटींच्या घरातही आहे. ती कर्ज माफ केली जाणार आहेत. सरसकट म्हणताना याचं भान ठेवणार आहात की नाही? असा सवालही पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जामुळे काहींना अटक झाली आहे, पण या माफीमुळे ते सुटतील. उद्धवजी, ही कर्जमाफी सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारी नाही, अशा प्रकारची टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबूक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...

IPL 2027 Updates: ९४ नव्हे ७४ सामनेच... आयपीएल तारखांमध्ये बदल, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नव्हे तर... ; BCCI ने दिले अपडेट्स

Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला मोठा दंड, तिलक वर्मावरही कारवाई; श्रीलंका दौऱ्यातील वादानंतर BCCIची मोठी अ‍ॅक्शन?

SCROLL FOR NEXT