chandrakant Patil Speaks About Bihar Election and Maharashtra Government 
पुणे

महाराष्ट्रात 4 वर्षे विरोधात बसण्याची आमची तयारी पण सरकार चालेल का? 

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपची विजयाची परंपरा कायम राहील. बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येईल. महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या या निकालावर ही त्याचा परिणाम होईल, त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर ही त्याचा परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागत आहे. अनेकदा ठाकरे सरकार लवकरच पडणार अशा चर्चाही अधून मधून होत असतात. त्यातच आता बिहारचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूकीबाबत विचारले असता, ''मला बिहार बाबत फार काही माहिती नाही. त्यामुळे तिथल्या राजकारणाबद्दल बोलता येणार नाही.'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यातील राजकारणाबाबत बोलताना पाटील यांनी म्हटलं की, ''महाराष्ट्रात आणखी चार वर्ष विरोधात बसण्याची तयारी आम्ही केली आहे. परंतु हे सरकार आणखी चार वर्ष चालेल असं वाटत नाही, आपापसातील भांडणामुळे हे सरकार पडेल मात्र आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही आम्ही घटनेच्या विरोधात कोणतेही काम करणार नाही.''

कोण घालणार आवर, समाजमंदिरावर टॉवर! भाड्यापोटी येणारे शुल्क नगरसेविकेच्या पतीच्या खिशात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर हळू हळू नियम शिथिल केले जात आहेत. मात्र, राज्यातील मंदिरे अद्याप उघडण्यात आलेली नाहीत. त्याबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की,''सर्वच प्रार्थनास्थळ खुली करावी अशी आमची मागणी आहे. मंदिर, मशीद, विहार हे सगळी खुली व्हावीत, ज्यांना वाटतं मंदिरात जाणं हे थोतांड आहे, त्यांनी जाऊ नये, परंतु ज्यांना जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मंदिरे खुली केली जावीत.''
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT