पुणे

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी कंपनीत 'बायो-बबल'चा फंडा!

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर(pune) : कामगारांच्या घरून कोरोनाचा (corona) संसर्ग कंपनीत येऊ नये आणि कंपनीतून कोरोनाचा संसर्ग कामगारांच्या घरी जाऊ नये, यासाठी वरवे बुद्रुक (ता.भोर) येथील एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बायो बबल(Bio Bubble) (जैव सुरक्षित वातावरण) हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत कामगार कंपनीतच सुरक्षित राहून काम करत आहेत. त्यामुळे कामगार आणि कामगारांचे कुटुंबीय यांचा कोरोनापासून बचाव होण्यास मदत होत आहे. इतर कंपन्यांनीही कोरोना काळात असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.(Company created Bio-Bubble to keep Corona away)

कोरोना काळातही उद्योग सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या ठिकाणचे कामगार कामास असतात. त्यामुळे कामगारांच्या घरून कंपनीत किंवा कंपनीतून कामगारांच्या घरी कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. हे लक्षात घेऊन भोर तालुक्यातील वरवे बुद्रुक येथील एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन आणि वरवे बुद्रुक ग्रामपंचायत यांनी मिळून कंपनीत बायो बबल (जैव सुरक्षित वातावरण) हा उपक्रम सुरू केला आहे.

या कंपनीत एकूण 121 कामगार आहेत. त्यातील सुमारे 50 टक्के कामगार वर्क फ्रॉम होम करतात. तर तर उर्वरीत 75 कामगारांची विभागणी करून कामाचे नियोजन करण्यात आले आहे. 75 कामगारांपैकी 35 कामगार एक आठवडा काम करतात. उर्वरीत 35 कामगार पुढच्या आठवडाभर काम करतात. तर पहिल्या आठवड्यात काम करणाऱ्या कामगारांना पुढील आठवडाभर पगारी सुट्टी देण्यात येते.

कामावर येण्यापूर्वी दोन दिवस अगोदर कामगारांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येते. तर कामावर रुजू होताना अँटीजेन चाचणी करण्यात येते. त्यांनतर आठवडाभर कामगार कंपनीत राहून काम करतात. कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनीतच कामगारांच्या राहण्याची, झोपण्याची, जेवण-नाष्टा आदींची सर्व सोय करण्यात आली आहे. या काळात कामगारांच्या घरी काही आवश्यक साहित्य, औषधे, वैद्यकीय गरज हवी असल्यास त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने दोन जणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून कंपनी कामगारांच्या घरी आवश्यक साहित्य पुरविले जाते.

एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक पराग जाधव म्हणाले, "कोरोना काळात कंपनी सुरू राहून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा कोरोनापासून बचाव झाला पाहिजे, या विचाराने आमचे कंपनी व्यवस्थापन आणि वरवे बुद्रुकचे सरपंच राहुल यादव, उपसरपंच अनिल माने, ग्रामपंचायत सदस्य विश्राम सोंडकर, देविदास माने यांनी हा उपक्रम कंपनीत सुरू केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन पटेल यांनीही या उपक्रमाला पाठींबा दिला. या उपक्रमामुळे कोरोनापासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा बचाव होत असून कामगार सुरक्षित वातावरणात राहत आहेत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT