पुणे

'जनता कर्फ्यू' असूनही भोसरी परिसरात हे काय चाललंय?

संजय बेंडे

भोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेने रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांनी हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे या परिसरातील सर्वच व्यवहार सुरळीत सुरू होते.

महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन शनिवारी (ता. ५) नागरिकांना केले. पलिसांद्वारे भोसरी परिसरात ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने याची माहिती रात्री उशिरा देण्यात येत होती. मात्र, जनता कर्फ्यूचा निर्णय रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती झाली नाही. त्याचप्रमाणे भाजी-फळे विक्रेते यांनी अगोदरच खरेदी केलेली भाजी-फळे विक्री करण्यासाठी भोसरीतील पीएमटी चौक, दिघी रस्ता, आळंदी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता त्याचप्रमाणे इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट चौक, दिघीतील ममता चौक रस्ता परिसर आदी भागात दुकाने थाटली होती. त्याचप्रमाणे भोसरीसह इतर परिसरातील दुकानेही सुरू होती. त्यामुळे पावसातही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे जनता कर्फ्यूचा भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परसरात फज्जा उडालेला दिसून आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत एका भाजी विक्रेत्याने सांगितले, की एकतर महापालिकेने जनता कर्फ्यू लागू केलेला आहे. त्याची कोणतीच कल्पना नाही. त्याचप्रमाणे इतर दिवसांपेक्षा रविवार हा सुटीचा दिवस असल्याने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी अधिक असते. त्यामुळे आम्ही रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक भाजी विक्रीसाठी आणतो. जनता कर्फ्यूची कल्पना नसल्याने विक्रीसाठी आणलेली भाजी विकली गेली नाही, तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने भाजी विक्रीचे दुकान सुरू ठेवले आहे. एका बेकरी व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की जनता कर्फ्यूची घोषणा उशिरा झाल्याने दररोजचे पहाटे विक्रीसाठी येणारे दूध घ्यावे लागले. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या दूधाची विक्री करणे गरजेचे असल्याने बेकरी सुरू ठेवली.

सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी सांगितले, की महापालिकेने दररोजची बाजारामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू करण्यासाठी सम-विषम तारखांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे दररोजपेक्षा निम्मीच दुकाने सुरू राहिल्याने पर्यायाने ग्राहकांची संख्याही कमी होईल. त्याचप्रमाणे महापालिकेने बंद विषयीची नियमावली जाहीर करून त्याचे काटेकोरपालन न करणाऱ्या नागरिक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचेही काही नागरिकांनी बोलून दाखविले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT