शाळा बंद!  sakal
पुणे

पुणे : शाळा बंदच्या निर्णयात झाली घाई

विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत पडणार खंड : मुख्याध्यापकांचे म्हणणे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असला, तरी तातडीने शाळा बंद करण्याचा निर्णय घाईने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरात अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेले इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा बंद करावे लागले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना घरी राहून शिक्षण घ्यावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार असल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.(school news pune)

राज्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसह काही ठिकाणी पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असले, तरीही ते तितकेसे प्रभावी ठरत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सध्या शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. या वर्गांना विद्यार्थी-पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.(School news)

‘‘इयत्ता पहिलीपासूनच्या शाळा सुरू होऊन १५ दिवसही झाले नाहीत आणि आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. खरंतर ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थी कोणीही समाधानी नव्हते. तात्पुरती सोय म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष शाळेत शिकविताना विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जाणीव शिक्षकांना झाली. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, स्थिती पूर्ववत आणण्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणच महत्त्वाचे आहे. अशात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रिया पुन्हा खंडित होणार आहे.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

‘‘शाळा बंद करण्याचा निर्णय घाईने घेतला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जवळपास दीड वर्षाच्या अंतराने विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आले होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता कुठे लेखन, वाचनात रूळायला लागली होती. पण आता पुन्हा शिक्षणात खंड पडणार आहे. शाळा बंद करणे हा पर्याय नव्हता, तर त्याऐवजी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पर्यायी विचार करणे गरजेचे होते.’’

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ

‘‘शहरात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाणही चांगले होते. अशात शाळांमधील शिक्षणाची घडी पुन्हा विस्कळीत झाली आहे. सरसकट शाळा बंद केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने सरसकट सर्व शाळा बंद करण्याऐवजी त्या-त्या शाळांना काही प्रमाणात शाळांना अधिकार देणे अपेक्षित होते.’’

- एकनाथ बोरसे, मुख्याध्यापक, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स सेकंडरी स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT