kr.jpg 
पुणे

कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याबाबत पुण्यातून झाली 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. या निर्णयामुळे बाजार आवारातील व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे. व्यापार टिकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करावा, अशी मागणी दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) पदाधिकारी, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी केली आहे.

संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन दिले आहे. राज्य शासनाने मार्केटयार्डातील व्यापारी टिकवण्यासाठी तेथील बाजारआवारातील देखरेख खर्च, अन्य खर्च रद्द करून बाजार समिती कायदा सुटसुटीत करावा. शेतीमाल खरेदी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी शासनाने समितीची स्थापना करावी. या समितीत व्यापाºयांचा समावेश करण्यात यावा,असे संचेती यांनी निवेदनात म्हटले आहे.

केंद्र शासनाने शेतीमाल विक्री नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल अन्य ठिकाणी विक्रीची परवानगी मिळणार आहे. तसेच कर्नाटक सरकारने बाजार समिती कायद्याात बदल करून बाजार आवारातील कर (सेस) एक रुपयांऐवजी ०.३५ केला आहे. बाजार समिती कायद्याात बदल करण्याचे गरज असल्याचेही संचेती यांनी निवेदनात नमूद केले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT