Staff
Staff 
पुणे

महाविद्यालयाबाबतचा 'तो' आदेश तत्काळ रद्द करा; शिक्षक संघटनेची सरकारकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविद्यालयात १०० टक्के उपस्थित राहण्यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांनी महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

याबाबत पवार म्हणाले, "हा निर्णय राज्यातील सर्व प्राध्यापकांसाठी धक्कादायक आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना, नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, सार्वजनिक ठिकाणी जायचे टाळा,  तसेच जमावबंदीचे आदेश हे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी दिलेले आहेत. असे असताना दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढणार आहे.

आत्ता मोठ्या शहरातील लोकल सेवा बंद आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक एकत्र कॉमन रूममध्ये बसतात. त्यामुळे पुढच्या काळात हा संसर्ग सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा अथवा त्याला स्थगिती द्यावी." संघटनेच्या वतीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्य सरकारला दिल्याचे पवार यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT