Ajit Pawar 
पुणे

केंद्राने आधी परदेशात लस देण्याची गरज नव्हती - उपमुख्यमंत्री

कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले.

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे आपण हिरक महोत्सवी वर्ष असून साजरे करू शकलो नाही असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकऱणासाठी निर्णय़ घेतला होता. त्यासाठी 5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी साधारण संख्या होती. एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. मात्र लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतलाय. आता लशीसाठी भारत बायोटेककडे आपण प्रयत्न करत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. याबाबत सांगताना अजित पवार म्हणाले की, सध्या दुर्गम भागात ऑनलाइन नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. तसंच आजच्या दिवशी फक्त 3 लाख लशी मिळाल्या आहेत. त्यापैकी 20 हजार लशी या पुण्यासाठी असून मुंबईला अधिक आहे अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. तरुणांना आणि ज्येष्ठाना कुठे दिली जाईल याची नियोजन करावे लागेल, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशाततील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का याबाबत विचार सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

परदेशात लस देण्याची गरज नव्हती

पहिल्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते. तर इतर राज्यात त्या तुलनेत कमी रुग्ण होते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले. लसीकरणाच्या मुद्यावरून बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, सुरवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे

तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याची तयारी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. तो आणखी 15 दिवसांनी वाढवला आहे. याबाबत सांगताना अजित पवार म्हणाले की, 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. जुलै ऑगस्ट मध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय त्या दृष्टीने काळजी घेतोय आपण तयारी करतोय, या अनुभवातून भारत सरकार आणि वेगवेगळे राज्य सरकार ही शिकलेत असंही अजित पवार यांनी म्हटलं.

ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी प्रयत्न

ऑक्सिजन किंवा रेमडिसिव्हीआर चा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेतोय. ऑक्सिजनसाठी अधिकारी काम करतायत. कुठून सोय करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. साखर कारखान्यांना आवाहन करण्यात आलं आहे. गडहिंग्लजला प्लांट लावला आहे. इतर ठिकाणी काही करता येतंय का ते पाहिलं जातंय. मोठ्या रुग्णालयांमध्ये प्लांट लावला तर रुग्णांची सोय होईल. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि नियोजन करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण

Solapur News: चक्क.. सरकारी जागांची खरेदी-विक्री; आ. विजय देशमुखांनी विधानसभेत उठवला आवाज, साेलापूर जिल्ह्यात नेमकं काय घडलं!

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

SCROLL FOR NEXT