DIG_Swati_Sathe 
पुणे

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कारागृह उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर दोन वेळा मुख्यालयाचा आणि एकदा पश्चिम विभागाचा पदभार असे सुमारे सहा वर्षे पुण्यात कार्यरत असलेल्या कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) स्वाती साठे यांची नागपुरात बदली झाली आहे. कारागृहाच्या पूर्व विभागातील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

गृह विभागाच्यावतीने साठे यांच्या बदलीचे आदेश सोमवारी (ता.१५) जारी करण्यात आले. पूर्व विभागाचे उपमहानिरीक्षक पद काही महिन्यापासून रिक्त होते. त्याचा अतिरिक्त कार्यभार अमरावती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांच्याकडे होता. साठे या गेल्या आठ महिन्यांपासून पुणे येथील कारागृह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

या आधी त्या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक होत्या. त्यांनी नाशिक, येरवडा, मुंबईतील ऑर्थर रोड जेलच्या प्रमुख तसेच नागपूर विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. कारागृहांचे नूतनीकरण आणि बंदीवानांचे वर्तणूक सुधारणेसह त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या आहेत.

दरम्यान, याबाबत साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र सोमवारी दुपारी बदलीचा आदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT