Migrant_Workers 
पुणे

'घरी जाण्याची घाई करू नका'; मुख्यमंत्र्यांनी का केलं असं आवाहन?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''परराज्यातील मजुरांची आतापर्यत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात आली आहे. यापुढे देखील घेऊ. त्यामुळे इतर राज्यातील मजुरांसह राज्यातील नागरिकांनी गावी जाण्याची घाई करू नये,'' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१८) केले.

राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील पाच लाख मजुरांना आत्तापर्यंत बस आणि रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे. असे असतानाही काही कामगार पायी गावी निघाले आहेत.

प्रवासादरम्यान त्यांचे अपघात देखील झाले आहेत. हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी थोडा धीर धरावा. कामगारांनी प्रवासात आहे त्याच ठिकाणी थांबावे. स्थानिक प्रशासन तुमची सोय करेल. लवकरचं तुम्हाला टप्प्याटप्प्याने गावी पाठवले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकही गावी जाण्याचा आग्रह धरीत आहे. मात्र आपण अस्वस्थ होऊ नका. तुम्हाला देखील टप्प्याटप्प्याने घरी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. त्यामुळे गावी जाणे किती गरजेचे आहे? याचा विचार करून थोडा धीर धरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.

शहरातून हजारो मजूर आणि विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. मात्र अनेक कामगार सध्या पायी, सायकल किंवा स्वतःच्या दुचाकीवर गावी निघाले आहेत. त्यात अगदी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या सर्वांना आपण आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

SCROLL FOR NEXT