PM_modi 
पुणे

'आंदोलनजिवी' हा शब्द म्हणजे हुतात्म्यांना दिलेली शिवी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजिवी हा शब्द आक्षेपार्ह आहे. भारताची निमिर्ती आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. शिवाय संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यामुळेच महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मोदी यांचा हा शब्द देशाच्या निमिर्ती प्रक्रियेचा व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०५ हुतात्म्यांचा अवमान करणारा आहे. हा शब्द म्हणजे सर्व हुतात्म्यांसाठी शिवीच असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बुधवारी (ता.१०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तेथील
नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी ट्र्म्प यांनी आंदोलकांबाबत
कसलाही वाईट शब्दप्रयोग केला नाही. भारताचे पंतप्रधान मात्र भर संसदेत
शेतकरी आंदोलकांबाबत वाईट शब्दाचा वापर करत आहेत. या कृतीतून ते
ट्रम्पपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न मोदी यांनी
केला असल्याचा आरोपही डॉ, देवी यांनी यावेळी केला.

डॉ. देवी म्हणाले, ''भारत हा पूर्वी अन्नधान्याच्या बाबतीत असुरक्षित
होता. त्यामुळे रशियात घोड्यांसाठी असलेले ईल्लू-मिल्लूसारखे अन्नधान्य
खाण्याची वेळ भारतीयांवर आली होती. तेव्हा शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन आणि पुरेशी सिंचनाची सोय नसतानाही देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सुरक्षित केले. केवळ शेतकऱ्यांमुळेच आपण अन्नधान्यात सुरक्षित झालो आहोत, हे विसरता कामा नये. शेतकरी आणि असंघटित कामगार या दोन घटकांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने कष्टमय जीवन जगणाऱ्या लोकांचा म्हणजे शेतकऱयांचा प्रश्न सहानुभूतीने सोडवणे गरजेचे होते.''

‘राष्ट्रपतींना दहा लाख सह्या पाठवणार'
देशातील शेतकऱयांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरी
आंदोलनात अडथळे आणण्यासाठीच सातत्याने प्रयत्न करताना दिसते आहे. परंतु या सर्व अडथळ्यांवर मात करत गेल्या मागील तीन महिन्यांपासून पंजाबचे शेतकरी सलग आंदोलन करत आहेत. त्यामुळे खरं तर, पंजाबच्या शेतकऱयांना सॅल्युट केला पाहिजे.

या आंदोलनाचा राष्ट्र सेवा दलाचा पाठिंबा आहे. याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील शेतकऱयांच्या दहा लाख सह्या जमा करण्यात येणार आहेत. या सह्या प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे जमा करून, त्या राष्ट्रपतींना पाठविण्याची मागणी या दोन्ही राज्य सरकारकडे केली जाणार असल्याचे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT