चास (पुणे) : चक्रिवादळाच्या तडाख्यात विजेच्या खांबांचे व तारांचे फार मोठे नुकसान झाले. मात्र, त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. अजूनही काही गावे अंधारात आहेत. परंतु, खेड तालुक्यातील पापळवाडी येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी केलेल्या सहकार्यामुळे तब्बल पाच दिवसांनतर वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, या पाच दिवसांत ग्रामस्थांचे विजेअभावी प्रचंड हाल झाले.
खेड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत होण्यास मोठा कालावधी खर्च झाला. या वादळामुळे विजेचे खांब कोसळले, मोडले वा वाकले, तर विजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पिठाची गिरणी, पाणी पुरवठा योजना, कृषी पंप बंद पडले. त्यातून नागरिकांचे जीवनच ठप्प झाले. ज्यांना शक्य होते, त्यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चास गावामधून पायी जाऊन दळणाची व्यवस्था केली, तर पाण्यासाठी महिलांनी पुन्हा डोक्यावर हांडे घेऊन विहिरींवर हजेरी लावली.
पाऊस झाल्याने शेतीसाठी विजेची वा पाण्याची गरज नव्हती. मात्र, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना विजेअभावी वाफ घेणे, यासारख्या समस्या उद्भवली, तर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरू असलेले क्लास अटेंड करता आले नाहीत. वीज वितरण कंपनीची मनुष्यबळ संख्या कमी असल्याने खंडीत विजपुरवठा सुरळीत होण्यास मोठा कालावधी लागणार होता.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन आपल्या गावात वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा, यासाठी पापळवाडी येथील नंदू शिंदे, सिताराम शिंदे, नंदू घनवट, महेंद्र शिंदे, मोहन शिंदे, जिवन शिंदे यांनी पुढाकर घेत वीज कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे पाच दिवसांवतर या गावचा वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.